शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘आम्ही संघ भूमीत भाजप साफ केली, तुम्ही कर्नाटकात करा’; विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक प्रचारात धडाडतेय

By कमलेश वानखेडे | Updated: May 6, 2023 17:32 IST

Nagpur News विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर : संघ भूमी असलेल्या नागपुरातच भाजपचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात नागपूरला भाजपचा गड सागणाऱ्यांचा गड काँग्रेसने नागपूर पदवीधर, नागपूर शिक्षक व अमरावती पदवीधर अशा विधान परिषदेच्या तीन जागा जिंकून उद्ध्वस्त केला आहे. विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे.

कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होत असून, १३ मे रोजी निकाल आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने विदर्भातील ज्येष्ठ नेत्यांवर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. माजी मंत्री

नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, आ. विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे हे प्रचारासाठी कर्नाटकात तळ ठोकून आहेत. गावोगावी फिरून प्रचार सभा घेत असून, तेथे नागपूरसह विदर्भात भाजपचे कसे पानिपत झाले आहे, हे कर्नाटकातील जनतेसमोर मांडत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करीत तुम्ही कर्नाटकात सरकार आणा, असे आवाहनही हे नेते मतदारांना करीत आहेत.

एवढेच नव्हे तर कोरोना काळातही महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तर येथेही शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास तेथील शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

प्रचारात ‘खोके अन् बोके’

- महाराष्ट्रातील सत्तांतर कर्नाटकच्या निवडणुकीत चांगलेच चर्चेत आहे. विदर्भातील काँग्रेस नेते खोके देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले व बोके सत्तेवर बसले, असा मुद्दा ठासून मांडत आहे. कर्नाटकात अशी खोके देऊन सरकार बनविण्याचा दूषित हेतू साध्य होऊ नये म्हणून एकतर्फी बहुमत द्या, असे भावनिक साकडे विदर्भातील काँग्रेस नेते कर्नाटकातील जनतेला घालत आहेत.

अशी आहे नेत्यांची जबाबदारी - उमेदवारांची यंत्रणा योग्यरित्या काम करीत आहे का, ते तपासणे, त्याला कुठे त्रास होत आहे याची माहिती घेणे.

- तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले नेते काम करीत आहेत का ते पाहणे व दिल्लीतील नेत्यांशी त्यांची भेट घालून देत त्यांना पक्षाच्या कामी लावणे.

- समज दिल्यानंतरही स्थानिक नेते विरोधात काम करीत असतील तर त्यांचा अहवाल हायकमांडला सादर करणे.

- बूथ स्तरावरील पक्षाची यंत्रणा कशी कार्यरत आहे याची पडताळणी करणे.

- मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या व विविध समाजातील प्रमुख लोकांच्या भेटी घेणे.

टॅग्स :BJPभाजपा