शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

है तैयार हम !

By admin | Updated: October 14, 2014 01:01 IST

भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण

शहर आणि ग्रामीण पोलिसही सज्ज : निमलष्करी दल मदतीलानागपूर : भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण पोलिसांनी गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे. मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून, धाक दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे कुठे पैसे, कुठे कपडे, कुठे भेटवस्तू तर कुठे दारू वाटली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी धावपळ चालवली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात हॉटेल, झोपडपट्ट्यात सर्चिंग सुरू आहे. चौकाचौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. एक हजार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार हजारावर पोलीस कर्मचारी मतदानाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस अकादमीतूनही पीएसआय बंदोबस्ताला बोलवून घेण्यात आले आहे. आयटीबीटी आणि सीआयएसएफ तसेच राज्य राखीव दलासह निमलष्करी दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी शहर पोलिसांनी बोलविल्या आहेत. मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. (प्रतिनिधी)ग्रामीण पोलिसही सज्जग्रामीण पोलिसांनीही जबरदस्त तयारी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी विधानसभा निवडणुकीअनुषंगाने बंदोबस्ताचे चांगले नियोजन केले आहे. १५० पोलीस अधिकारी आणि २०० कर्मचारी तसेच ६२७ होमगार्डच्या मदतीने डॉ. आरती सिंह यांनी मतदानाच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, सीआयडी, क्राईम पूणे येथील पोलीस अधिकारी, राज्य व केंद्रीय राखीव दल आणि तामिळनाडू तसेच तेलंगणा येथून निमलष्करी दलाच्या एकूण पाच तुकड्या बोलवून डॉ. सिंह यांनी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडांची धरपकड सुरू आहे. ठिकठिकाणी दारूचा साठा पकडण्यात आला आहे. परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या आहेत. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यतील गुंडांवर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. वाहनांची आणि संशयित व्यक्तीचीही कसून तपासणी केली जात आहे.