शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

है तैयार हम !

By admin | Updated: October 14, 2014 01:01 IST

भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण

शहर आणि ग्रामीण पोलिसही सज्ज : निमलष्करी दल मदतीलानागपूर : भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण पोलिसांनी गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे. मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून, धाक दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे कुठे पैसे, कुठे कपडे, कुठे भेटवस्तू तर कुठे दारू वाटली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी धावपळ चालवली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात हॉटेल, झोपडपट्ट्यात सर्चिंग सुरू आहे. चौकाचौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. एक हजार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार हजारावर पोलीस कर्मचारी मतदानाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस अकादमीतूनही पीएसआय बंदोबस्ताला बोलवून घेण्यात आले आहे. आयटीबीटी आणि सीआयएसएफ तसेच राज्य राखीव दलासह निमलष्करी दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी शहर पोलिसांनी बोलविल्या आहेत. मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. (प्रतिनिधी)ग्रामीण पोलिसही सज्जग्रामीण पोलिसांनीही जबरदस्त तयारी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी विधानसभा निवडणुकीअनुषंगाने बंदोबस्ताचे चांगले नियोजन केले आहे. १५० पोलीस अधिकारी आणि २०० कर्मचारी तसेच ६२७ होमगार्डच्या मदतीने डॉ. आरती सिंह यांनी मतदानाच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, सीआयडी, क्राईम पूणे येथील पोलीस अधिकारी, राज्य व केंद्रीय राखीव दल आणि तामिळनाडू तसेच तेलंगणा येथून निमलष्करी दलाच्या एकूण पाच तुकड्या बोलवून डॉ. सिंह यांनी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडांची धरपकड सुरू आहे. ठिकठिकाणी दारूचा साठा पकडण्यात आला आहे. परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या आहेत. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यतील गुंडांवर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. वाहनांची आणि संशयित व्यक्तीचीही कसून तपासणी केली जात आहे.