शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:36 IST

शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.शहराच्या सर्व भागात नळावाटे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. २४ बाय ७ योजनेअंतर्गत हा पुरवठा होत आहे. मात्र, या योजनेत विषमता दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवसातून तीन वेळा, तर काही ठिकाणी दररोज तीन तास आणि काही ठिकाणी अर्धा-पाऊण तास, असा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही अधिक होत आहे. वाठोडा भागात पाणीपुरवठ्याच्या या विषमतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष मिटविण्यासाठी नगरसेवकांकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ज्या टँकर्समधून पाणीपुरवठा केला जातो, त्यातील काही टँकर्स फुटलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून येते. एकीकडे नळाद्वारे पाणीपुरवठ्यात विषमता, दुसरीकडे फुटलेल्या टँकर्समधून होत असलेली पाण्याची नासाडी आणि तरीही पाण्याच्या समस्येपासून होत नसलेली मुक्ती, या संकटात नागरिक सापडले आहेत.दुरुस्ती करावी अथवा बाद करावे!गेल्या वर्षी नागपुरात पाण्याच्या टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली होती. ते उदाहरण ताजेच असताना यंदा टँकर मालकांना पाण्याची नासाडी होऊ नये, या अनुषंगाने तंबी देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. यंदा पाणी मुबलक असले तरी ते टिकवण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, फुटलेल्या टँकरला परवानगी देऊन नागरी संपत्तीचे नुकसानच शासन-प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, अशा टँकर्सची दुरुस्ती करणे अथवा ते बाद करणेच उत्तम ठरेल.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर