शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:36 IST

शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.शहराच्या सर्व भागात नळावाटे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. २४ बाय ७ योजनेअंतर्गत हा पुरवठा होत आहे. मात्र, या योजनेत विषमता दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवसातून तीन वेळा, तर काही ठिकाणी दररोज तीन तास आणि काही ठिकाणी अर्धा-पाऊण तास, असा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही अधिक होत आहे. वाठोडा भागात पाणीपुरवठ्याच्या या विषमतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष मिटविण्यासाठी नगरसेवकांकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ज्या टँकर्समधून पाणीपुरवठा केला जातो, त्यातील काही टँकर्स फुटलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून येते. एकीकडे नळाद्वारे पाणीपुरवठ्यात विषमता, दुसरीकडे फुटलेल्या टँकर्समधून होत असलेली पाण्याची नासाडी आणि तरीही पाण्याच्या समस्येपासून होत नसलेली मुक्ती, या संकटात नागरिक सापडले आहेत.दुरुस्ती करावी अथवा बाद करावे!गेल्या वर्षी नागपुरात पाण्याच्या टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली होती. ते उदाहरण ताजेच असताना यंदा टँकर मालकांना पाण्याची नासाडी होऊ नये, या अनुषंगाने तंबी देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. यंदा पाणी मुबलक असले तरी ते टिकवण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, फुटलेल्या टँकरला परवानगी देऊन नागरी संपत्तीचे नुकसानच शासन-प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, अशा टँकर्सची दुरुस्ती करणे अथवा ते बाद करणेच उत्तम ठरेल.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर