शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टंचाई असताना पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:36 IST

शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत टँकरद्वारे पाण्याची उधळपट्टी होत असल्याचेही दिसून येत आहे.शहराच्या सर्व भागात नळावाटे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. २४ बाय ७ योजनेअंतर्गत हा पुरवठा होत आहे. मात्र, या योजनेत विषमता दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवसातून तीन वेळा, तर काही ठिकाणी दररोज तीन तास आणि काही ठिकाणी अर्धा-पाऊण तास, असा पाणीपुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही अधिक होत आहे. वाठोडा भागात पाणीपुरवठ्याच्या या विषमतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष मिटविण्यासाठी नगरसेवकांकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ज्या टँकर्समधून पाणीपुरवठा केला जातो, त्यातील काही टँकर्स फुटलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून येते. एकीकडे नळाद्वारे पाणीपुरवठ्यात विषमता, दुसरीकडे फुटलेल्या टँकर्समधून होत असलेली पाण्याची नासाडी आणि तरीही पाण्याच्या समस्येपासून होत नसलेली मुक्ती, या संकटात नागरिक सापडले आहेत.दुरुस्ती करावी अथवा बाद करावे!गेल्या वर्षी नागपुरात पाण्याच्या टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली होती. ते उदाहरण ताजेच असताना यंदा टँकर मालकांना पाण्याची नासाडी होऊ नये, या अनुषंगाने तंबी देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. यंदा पाणी मुबलक असले तरी ते टिकवण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, फुटलेल्या टँकरला परवानगी देऊन नागरी संपत्तीचे नुकसानच शासन-प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, अशा टँकर्सची दुरुस्ती करणे अथवा ते बाद करणेच उत्तम ठरेल.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर