शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

हुडकेश्वर-नरसाळाच्या नागरिकांना १५ ऑगस्टपूर्वी पाणीपुरवठा करा : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:16 IST

हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या समस्यांसाठी कामाचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा व जिल्हा प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देहुडकेश्वर येथे जनसंवाद कार्यक्रम१५-१५ दिवस साफसफाई होत नाहीपावसाळ्यापूर्वी नालासफाई करासमस्यांच्या निवेदनावर प्रस्ताव करून तीन दिवसात सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या समस्यांसाठी कामाचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा व जिल्हा प्रशासनाला दिले.हुडकेश्वर येथील राधाकृष्ण सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांकडे समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमामुळे पालकमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती अजय बोढारे, डी.डी. सोनटक्के, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, हाथीबेड, मडावी, डॉ. प्रीती मानमोडे, जि.प. सदस्य शुभांगी गायधने, किशोर कुंभारे, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका, आरोग्य विभाग, साफसफाई, पाणीपुरवठा, दलित वस्तीमधील कामे, महावितरण अशा सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून संबंधित समस्यांची निवेदने त्यांना देण्यात आली. पावसाळी नाली साफसफाई, रस्त्यांची कामे, सिमेंट रस्त्यांची कामे, पाणीपुरवठ्यााच्या जलकुंभाची कामे अशा कामांचा आढावा घेण्यात आला. ४ पैकी ३ जलकुंभाची कामे पूर्ण झाली आहेत.येत्या १५ ऑगस्टपूर्वी महावितरणने हुडकेश्वर नरसाळा भागातील सर्व पथदिव्यांचे खांब लावून त्यावर दिवे लावावे, अशा सूचना देण्यात आल्या. निधीची कोणतीही कमी नाही. पण काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश देण्यात आले. साफसफाईबाबत कर्मचाऱ्यांची रिक्तपदे अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक भागात १५-१५ दिवस झाडू मारणारे पोहोचत नाही. तसेच रस्ते उंच झाले आणि नागरिकांची घरे खोल झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी घरांमध्ये घुसते. सिमेंट रस्ते करताना प्रत्येक १० मीटरवर खाली पाईप टाकण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. साफसफाई मनपाचे कर्मचारी करीत नसल्याच्या तक्रारी जनसंवादमध्ये करण्यात आल्या.खुल्या जागांना संरक्षण भिंती, अनधिकृत व्यवसायावर नियंत्रण या समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. अजय बोढारे, डीडी सोनटक्के, भगवान मेंढे, उपस्थित नगरसेविका आदींनी या भागातील समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.जनसंवादानंतर पालकमंत्र्यांनी या भागाचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्यांवर प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक समस्येच्या निवेदनावर कारवाई करण्याचे व त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी जनतेला दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेguardian ministerपालक मंत्रीnagpurनागपूरWaterपाणी