शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच नळावर हजारो लोकांचा भार; पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 13:43 IST

विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देरोटकर लेआऊटमध्ये घाणीचे साम्राज्यविठ्ठलनगर परिसरात पाणी प्रश्न

नागपूर : महापालिकेच्या हद्दीत २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील काही वस्त्यांना एकाच सार्वजनिक नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. पहाटे ५ वाजतापासून रात्री एक वाजेपर्यंत चिल्ल्यापिल्ल्यांपासून वयोवृद्ध पाणी भरताना दिसून येतात.

विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. हजारो लोक नळावर पाण्यासाठी येत असल्याने भांडणेसुद्धा होतात.

विशेष म्हणजे, हा सार्वजनिक नळ २४ बाय ७ सुरू असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात येथे २४ बाय ७ गर्दी दिसते. सध्या नळावर पहाटेपासूनच लोक पाण्यासाठी रांगा लावतात. दुपारी गर्दी थोडी ओसरत असली तरी सायंकाळपासून पुन्हा पाण्यासाठी कॅन घेऊन दूरवरून लोक येथे पोहोचतात.

आज येईल, उद्या येईल या अपेक्षेने गेल्या दहा वर्षांपासून ‘हर घर नल से जल’ची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. आम्हाला सांगण्यात आले की कुठे तरी पाण्याच्या टाक्या बनल्या आहेत. तेथून पाणीपुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. वर्षानुवर्षे आम्ही येथे राहत आहोत. वर्षभर पाण्यासाठी आम्हाला त्रास सहन करावा लागतो आहे, अशी भावना सुनील कांबळे, दिवाकर कानतोडे, अमित इंगळे, वाडगुजी वानखेडे यांनी व्यक्त केली.

- रोटकर लेआऊटमधील रहिवासी गटारीच्या घाणीने संतप्त

रोटकर लेआऊट येथील रहिवासी गटारलाईन नसल्याने चांगलेच संतप्त आहेत. वस्तीतील घरे टुमदार आहेत, पण गटारीच्या घाणीचा ठपका वस्तीवर लागला आहे. गटारलाईन नसल्याने लोकांनी बांधलेले सेप्टी टँक वारंवार ओव्हरफ्लो होतात. ही घाण सोडायची कुठे हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. काही घरांना तर दर महिन्याला मनपाची गाडी बोलवावी लागते. त्यामागे २ हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. काही लोकांनी घराशेजारी असलेल्या रिकाम्या प्लॉटवर घाण सोडलेली आहे. या वस्तीमध्ये यापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. या घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे येथील अनिल निळे, सुभाष भगत, सुभाष शेंडे, सुभाष रामटेके, राजेश निपाने, प्रणय पेठे यांनी व्यक्त केली.

- २० वर्षांपासून रस्ता नाही

शारदानगर, गजाननगर या वस्त्यांमध्ये अजूनही रस्ता बनलेला नाही. कच्च्या रस्त्यांमुळे लोकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होत आहे. वस्त्यांमध्ये विद्युत खांबाला लाईट नाही. रस्ते खराब, त्यात लाइट नाही, यामुळे लोक वैतागले आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा नसल्याने लोक विहिरी व बोअरवेलवर अवलंबून आहेत. श्यामनगरात रिकाम्या प्लॉटमुळे लोक वैतागले आहेत. रिकाम्या प्लॉटमध्ये परिसरातील घाण टाकली जाते. झाडेझुडपे वाढलेली आहेत. २० वर्षे झाली आम्ही राहत आहोत, किमान लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गौपाल लोहकरे, तुषार मालखेडे, शंकर शेरसिया यांनी केली.

टॅग्स :SocialसामाजिकSmart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूरWaterपाणी