शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

एकाच नळावर हजारो लोकांचा भार; पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 13:43 IST

विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देरोटकर लेआऊटमध्ये घाणीचे साम्राज्यविठ्ठलनगर परिसरात पाणी प्रश्न

नागपूर : महापालिकेच्या हद्दीत २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील काही वस्त्यांना एकाच सार्वजनिक नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. पहाटे ५ वाजतापासून रात्री एक वाजेपर्यंत चिल्ल्यापिल्ल्यांपासून वयोवृद्ध पाणी भरताना दिसून येतात.

विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. हजारो लोक नळावर पाण्यासाठी येत असल्याने भांडणेसुद्धा होतात.

विशेष म्हणजे, हा सार्वजनिक नळ २४ बाय ७ सुरू असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात येथे २४ बाय ७ गर्दी दिसते. सध्या नळावर पहाटेपासूनच लोक पाण्यासाठी रांगा लावतात. दुपारी गर्दी थोडी ओसरत असली तरी सायंकाळपासून पुन्हा पाण्यासाठी कॅन घेऊन दूरवरून लोक येथे पोहोचतात.

आज येईल, उद्या येईल या अपेक्षेने गेल्या दहा वर्षांपासून ‘हर घर नल से जल’ची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. आम्हाला सांगण्यात आले की कुठे तरी पाण्याच्या टाक्या बनल्या आहेत. तेथून पाणीपुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. वर्षानुवर्षे आम्ही येथे राहत आहोत. वर्षभर पाण्यासाठी आम्हाला त्रास सहन करावा लागतो आहे, अशी भावना सुनील कांबळे, दिवाकर कानतोडे, अमित इंगळे, वाडगुजी वानखेडे यांनी व्यक्त केली.

- रोटकर लेआऊटमधील रहिवासी गटारीच्या घाणीने संतप्त

रोटकर लेआऊट येथील रहिवासी गटारलाईन नसल्याने चांगलेच संतप्त आहेत. वस्तीतील घरे टुमदार आहेत, पण गटारीच्या घाणीचा ठपका वस्तीवर लागला आहे. गटारलाईन नसल्याने लोकांनी बांधलेले सेप्टी टँक वारंवार ओव्हरफ्लो होतात. ही घाण सोडायची कुठे हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. काही घरांना तर दर महिन्याला मनपाची गाडी बोलवावी लागते. त्यामागे २ हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. काही लोकांनी घराशेजारी असलेल्या रिकाम्या प्लॉटवर घाण सोडलेली आहे. या वस्तीमध्ये यापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. या घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे येथील अनिल निळे, सुभाष भगत, सुभाष शेंडे, सुभाष रामटेके, राजेश निपाने, प्रणय पेठे यांनी व्यक्त केली.

- २० वर्षांपासून रस्ता नाही

शारदानगर, गजाननगर या वस्त्यांमध्ये अजूनही रस्ता बनलेला नाही. कच्च्या रस्त्यांमुळे लोकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होत आहे. वस्त्यांमध्ये विद्युत खांबाला लाईट नाही. रस्ते खराब, त्यात लाइट नाही, यामुळे लोक वैतागले आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा नसल्याने लोक विहिरी व बोअरवेलवर अवलंबून आहेत. श्यामनगरात रिकाम्या प्लॉटमुळे लोक वैतागले आहेत. रिकाम्या प्लॉटमध्ये परिसरातील घाण टाकली जाते. झाडेझुडपे वाढलेली आहेत. २० वर्षे झाली आम्ही राहत आहोत, किमान लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गौपाल लोहकरे, तुषार मालखेडे, शंकर शेरसिया यांनी केली.

टॅग्स :SocialसामाजिकSmart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूरWaterपाणी