शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील गावांमध्ये जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:19 IST

अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या इराद्याने ‘पाणी फाऊंडेशन’ने चळवळ उभारली. नागपूर जिल्ह्यातील ‘ड्राय झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड तालुक्यातील तब्बल ६६ गावांचा यावर्षी पाणी फाऊंडेशनने ‘वॉटर कप स्पर्धे’त समावेश केला. पाहता पाहता या चळवळीला लोकचळवळीचे रूप आले आणि या गावांमध्ये चक्क जलक्रांती अवतरल्याचे आता चित्र आहे. ही पाणी फाऊंडेशनच्या यशाची पावती असून त्यात लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा ठरला.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या कार्याला मिळाली यशाची पावती : खंडविकास अधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या इराद्याने ‘पाणी फाऊंडेशन’ने चळवळ उभारली. नागपूर जिल्ह्यातील ‘ड्राय झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड तालुक्यातील तब्बल ६६ गावांचा यावर्षी पाणी फाऊंडेशनने ‘वॉटर कप स्पर्धे’त समावेश केला. पाहता पाहता या चळवळीला लोकचळवळीचे रूप आले आणि या गावांमध्ये चक्क जलक्रांती अवतरल्याचे आता चित्र आहे. ही पाणी फाऊंडेशनच्या यशाची पावती असून त्यात लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा ठरला.नरखेड तालुक्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार करीत हजारो ग्रामस्थ या मोहिमेत स्वयंस्फूर्तपणे सहभागी झाले. तब्बल ४५ दिवस ग्रामस्थांनी रात्रंदिवस काम करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न चालविले. विशेष म्हणजे, यामध्ये गावातील आबालवृद्धांपासून बच्चेकंपनीपर्यंत सर्वच सहभागी झाले, हे विशेष! एवढेच काय ज्यांना जेवढे जमेल तेवढे पैसे या मोहिमेच्या खर्चासाठी स्वयंस्फूर्तीने दिले. यातून उभा झालेला निधी पाहता गावातील कोणतेच काम आता अशक्य नाही, हा आत्मविश्वासही या मोहिमेची फलश्रुती आहे. उमठा, बरडपवनी, गायमुख पांढरी, शेमडा, खैरगाव, मेंढला, वाढोणा आदी गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात आली.पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर ते वाहून जाते. त्या पाण्याचा सदुपयोग होत नाही. परिणामी दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवणे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवणे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला शिकवणे हे पाणी फाऊंडेशनचे सूत्र आहे. यानुसार नरखेड तालुक्यातील ४५० ग्रामस्थांनी सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी २५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली. स्पर्धेदरम्यान ४५ दिवस श्रमदान करून आपापल्या गावांमध्ये सी. सी.टी., डीप. सी. सिटी, नाला खोलीकरण, शेततळे, गॅबियन बंधारा, एल. बी. एस. आदी जलासंधारणाची कामे करण्यात आली. ग्रामस्थांनी पाणीसाठ्यासाठी जलपात्रे तयार केली. ती जलपात्रे भरण्यासाठी पावसाची वाट होती. दमदार पावसाने हजेरी लावली आणि ती जलपात्रे भरू लागली. गावातील पाणी वाहून गेले नाही.गावातील पाणी गावातच साचल्याचे पाहून ग्रामस्थही आनंदी झाले. त्या जलपात्रासोबत सेल्फी काढून ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत.या मोहिमेमुळे गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, हे विशेष!कौतुकाची थापलोकसहभागातून व श्रमदानाच्या माध्यमातून झालेल्या गावातील कामांची पाहणी नव्याने रुजू झालले खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी केली. गायमुख पांढरी, बरडपवनी, उमठा आदी गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेट देत पाणी फाऊंडेशच्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी करीत फाऊंडेशन आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. ग्रामस्थांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी ‘पाणी फाऊंंडेशन’चे तालुका समन्वयक रूपेश वाळके, अतुल तायडे, प्रवीण दहेकर, ओम खोजरे, भास्कर विघे यांच्यासह उमठा, बरडपवनी, गायमुख येथील नागरिक उपस्थित होते.दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकरनरखेड तालुक्यातील गावांमध्ये डोंगर परिसरात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केली. राज्याचा ५० टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता. या दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनने प्राधान्य दिले. जलसंधारणासह ग्रामस्थांमध्ये मनसंधारणाही यानिमित्ताने झाल्याने गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या माध्यमातून ही कामे झाल्यामुळे लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण झाले. राजकारण, गट-तट बाजूला सारून पाण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता ग्रामस्थांमध्ये तयार झाली. रुपेश वाळके,समन्वयक, पाणी फाऊंडेशन, नरखेड तालुका.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर