शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

जलसंपदाच्या कामाचे होणार आॅडिट

By admin | Updated: July 27, 2016 02:47 IST

सिंचन प्रकल्पांची कामे अधिक दर्जेदार, गतिमान व पारदर्शक व्हावीत तसेच प्रकल्पाचा लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळावा,

सरकारचा निर्णय : प्रकल्पांच्या कामात पारदर्शकता येणार नागपूर : सिंचन प्रकल्पांची कामे अधिक दर्जेदार, गतिमान व पारदर्शक व्हावीत तसेच प्रकल्पाचा लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी जलसंपदा विभागाचे नियमित तांत्रिक परीक्षण व बांधकाम परीक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी त्रयस्थ सक्षम यंत्रणा निर्माण करून विभागाचे तांत्रिक परीक्षण व बांधकाम परीक्षण (आॅडिट) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या नियंत्रणाखाली अस्तित्वात असलेल्या पाच दक्षता पथकांकडे सध्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादेशिक कार्यालये, मंडळ व विभागीय कार्यालयांचे आॅडिट करण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वातील तीन गुणनियंत्रक मंडळांवर कार्यक्षेत्रातील कामाच्या गुणनियंत्रणाबरोबरच बांधकाम आॅडिटची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पाची बांधकाम कालमर्यादा, खर्च व गुणवत्ता यावर नियंत्रण ठेवणे तसेच प्रकल्पाचे नियोजित लाभ मिळत आहे की नाही, याची खातरजमा के ली जाणार आहे. व्यवस्था दोष व तांत्रिक त्रुटी वेळीच शासनाच्या निदर्शनास याव्यात, त्यावर तातडीने उपाययोजना करणे शासनाला शक्य व्हावे, यासाठी आॅडिट व्यवस्था निर्माण केली जात आहे. यात तांत्रिक त्रुटीबाबत जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. निर्णय प्रक्रि येत पारदर्शकता आणून संभाव्य अनियमिततेला आळा घातला जाईल. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीविषयी जागरूकता निर्माण करण्यात येईल, याबाबतचे आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव र.ए. उपासनी यांनी काढले आहे.(प्रतिनिधी) तांत्रिक आॅडिटची कार्यपद्धती जलसंपदा विभागाच्या प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे व मंडळ कार्यालयांचे तांत्रिक परीक्षण दरवर्षी क रण्यात यावे. विभागीय कार्यालयाचे तांत्रिक परीक्षण दोन वर्षांतून एकदा करण्यात यावे. परीक्षणामध्ये विविध स्तरावरील तांत्रिक मान्यता, निविदा मंजुरी, अतिरिक्त बाब दर सूची, निविदा याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घेतेले निर्णय नियमानुसार असणे अपेक्षित आहे. शासनाने निर्देशित केल्यास दक्षता पथक याबाबतचा अहवाल शासनाला सादर करेल. अस्तित्वातील तीन गुणनियंत्रण मंडळाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामांबाबतचे गुणनियंत्रणाबरोबरच बांधकाम आॅडिट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एखाद्या कामाबाबत शंका निर्माण झाल्यास व प्राथमिक चौकशीत निदर्शनास आल्यास कामाचे आॅडिट केले जाणार आहे. करण्यात आलेले काम खर्चाच्या सुसंगत आहे की नाही, याची चौकशी क रण्यात येईल. ग्रामविकास व जलसंपदा विभागांतर्गत गुण नियंत्रण मंडळे व पथके गठित करण्यात येतील. यासाठी पाच दक्षता पथकाच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली आहे.