शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जलसंपदा विभागाचे ७०.७८ काेटी रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काेरडवाहू शेती ओलिताखाली येण्यासाठी १० वर्षांपूर्वी सत्रापूर उपसा सिंचन याेजनेची ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील काेरडवाहू शेती ओलिताखाली येण्यासाठी १० वर्षांपूर्वी सत्रापूर उपसा सिंचन याेजनेची निर्मिती करीत त्यावर ७० काेटी ७८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या याेजनेच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या शेतकऱ्यांना या काळात ओलितासाठी थेंबभरही पाणी मिळाले नाही. त्यामुळे या याेजनेवर करण्यात आलेला संपूर्ण खर्च पाण्यात गेला आहे.

पेंच धरणाच्या पाण्यावर रामटेक तालुक्यातील २७ गावांमधील शेतकरी ओलित करतात. उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे काेरडवाहू शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी मध्यंतरी आंदाेलनेही करण्यात आली. रामटेक व पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून सन २०१० मध्ये सत्रापूर उपसा सिंचन याेजना आखण्यात आली.

सुरुवातीला या याेजनेची प्रस्तावित किंमत ३८ काेटी ७८ लाख रुपये हाेती. त्यानंतर सुधारित ७० काेटी ७८ लाख रुपयांच्या प्रस्तावित खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हा निधी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या माध्यमातून वेळाेवेळी उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी पेंच धरणाजवळ पंपहाऊस तयार करण्यात आले.

नियमित पाणी मिळाल्यास आपण पाणीपट्टी भरायला तयार आहाेत. शक्य असल्यास ही याेजना साैर ऊर्जेवर चालवावी, असेही साेनेघाट, चाैघान येथील शेतकऱ्यांनी सांगितले. कालव्याच्या दुरुस्तीसह याेजनेत काही बदल केल्यास ही याेजना आजही शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरू शकते. त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.

...

वीज पुरवठा खंडित

सत्रापूर उपसा सिंचन याेजनेकडे सध्या विजेचे तीन लाख रुपयांचे बिल थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही थकीत बिलाचा भरणा करण्यात न आल्याने महावितरण कंपनीने या याेजनेचा वीज पुरवठा वर्षभरापूर्वी खंडित केला. या भागातील शेतकरी पाणीपट्टी घ्या, पण पाणी द्या, अशी वारंवार मागणी करीत आहेत; मात्र सिंचन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करीत नाहीत, त्यामुळे विजेचे बिल भरण्यासाठी पैसे आणणार कुठून, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याचे खापर मात्र शेतकऱ्यांच्या माथी फाेडले जात आहे.

...

कालव्याचे काम सदाेष

पेंच धरणातील पाण्याची पंपद्वारे उचल केल्यानंतर ते साेनेघाट, चाैघान शिवारापर्यंत पाेहाेचविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कालव्याची निर्मिती करण्यात आली. कालवा तयार करताना अधिकाऱ्यांनी उंच, सखल भाग विचारात घेतला नाही. त्यामुळे साेनेघाट, चाैघान या शेवटच्या टाेकावर या १० वर्षात पाणी पाेहाेचले नाही, त्यामुळे कालव्याचे काम सदाेष असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शासनाने ही याेजना शेतकरी संस्था किंवा पाणी वाटप अथवा वापर संस्था स्थापन करून चालवायला हवी हाेती; परंतु पाटबंधारे विभागाने तसे न करता ही याेजना स्वत: चालवायचा निर्णय घेतला व ताे बाेकांडी बसला.

..

ड्रीम प्रोजेक्ट

या भागातील धानाचे पीक पाण्याअभावी वाया जावू नये म्हणून माजी मंत्री ॲड. मधुकरराव किंमतकर यांनी ही याेजना शासनाशी भांडून मंजूर करवून घेतली हाेती. त्यामुळे ही याेजना ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नावाने ओळखली जायची. सध्या या याेजनेच्या कालव्यात झाडे व गवत वाढले आहे. ठिकठिकाणी कालव्याचे गेट तुटले आहेत. कालव्यात पाणी साेडल्यानंतर ते शेतात कमी जाते. शेतकऱ्यांना पाण्याअभावी धानाचे समाधानकारक उत्पादन घेणे शक्य हाेत नाही.