शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

२०२४ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घराला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 22:33 IST

Jal Jivan Mission, nagpur news प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने शासन ‘हर घर नल’ हा उपक्रम राबवीत आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजल जीवन मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यात ९२.२९ टक्के कामे पूर्ण

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने शासन ‘हर घर नल’ हा उपक्रम राबवीत आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्याला ९१,६०४ नळ जोडणीचे टार्गेट दिले होते. आतापर्यंत ९२.२९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानांतर्गत २०२४ मध्ये प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजना यामध्ये परिवर्तित होणार आहेत. ही योजना लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ४१९ लाभधारक कुटुंबांपैकी १ लाख ५४ हजार १९० कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी असल्याने २ लाख ११ हजार २२९ कुटुंबाला ही नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. मे महिन्यापासून कामाला सुरुवात झाली असून, ८४ हजार ५३८ नळ जोडणी व त्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.

नागपूर(ग्रा.)मध्ये सर्वाधिक कामे

वैयक्तिक नळ जोडणीचे सर्वाधिक काम नागपूर ग्रामीण तालुक्यात १६७.८३ टक्के झाले आहे. त्यापाठोपाठ मौदा व कामठी तालुक्यात उद्दिष्टापेक्षा कामे झाली आहेत. तर कुही, भिवापूर, कळमेश्वरात ५० टक्क्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर