शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

२०२४ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घराला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 22:33 IST

Jal Jivan Mission, nagpur news प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने शासन ‘हर घर नल’ हा उपक्रम राबवीत आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजल जीवन मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यात ९२.२९ टक्के कामे पूर्ण

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने शासन ‘हर घर नल’ हा उपक्रम राबवीत आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्याला ९१,६०४ नळ जोडणीचे टार्गेट दिले होते. आतापर्यंत ९२.२९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानांतर्गत २०२४ मध्ये प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजना यामध्ये परिवर्तित होणार आहेत. ही योजना लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ४१९ लाभधारक कुटुंबांपैकी १ लाख ५४ हजार १९० कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी असल्याने २ लाख ११ हजार २२९ कुटुंबाला ही नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. मे महिन्यापासून कामाला सुरुवात झाली असून, ८४ हजार ५३८ नळ जोडणी व त्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.

नागपूर(ग्रा.)मध्ये सर्वाधिक कामे

वैयक्तिक नळ जोडणीचे सर्वाधिक काम नागपूर ग्रामीण तालुक्यात १६७.८३ टक्के झाले आहे. त्यापाठोपाठ मौदा व कामठी तालुक्यात उद्दिष्टापेक्षा कामे झाली आहेत. तर कुही, भिवापूर, कळमेश्वरात ५० टक्क्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर