शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गोसेखुर्द प्रकल्पासाठी जल आयोगाकडून ७५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:25 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ ४गोसेखुर्द प्रकल्पामधून तीन जिल्ह्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील २२९९७ हेक्टर सिंचन क्षमतेपैकी १३६९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील ८७६४७ क्षमतेपैकी २४३मुख्यमंत्र्यांची प्राथमिकता या प्रकल्पाचे काम नियोजित आराखड्यानुसार पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे. गोसेखुर्द प्रकल्प नऊ घटक मिळून तयार झाला असून यामध्ये मुख्य धरण, चार उपसासिंचन यशेतकऱ्यांना मिळेल थेट पाणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यकालव्यातून बंद नलिकांव्दारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नेण्यात येणार आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील ३०६००हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून ६२२६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. वितरिकेची कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून २०२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ४या प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत आहे. भातासह इतर पीकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्व विदभार्साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे ७१८१० हेक्टर सिंचन निर्माण होणार असून त्यापैकी १३९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा १३ किलोमीटरचा असून यामधून ३१५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी १० ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. ४३ किलोमीटर मुख्य कालव्यातून १२३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.चार उपसा सिंचन योजना४या प्रकल्पावर चार उपससिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर ७७१० हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर १११९५ हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, तसेच अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी दिली.प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे४डिसेंबर २०१७ पर्यंत ९४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा व आॅक्टोबर २०१८ पर्यंत ११४६ दलघमी पूर्ण पाणीसाठा निर्माण करणे.४धरणाचे सांडव्यामधील चार बांधकाम विमाचके बंद करण्याचे काम पूर्ण करणे.४मोखाबर्डी उपसासिंचन योजना कार्यान्वित करून १४९८ हेक्टर व जून २०१८ पर्यंत अतिरिक्त ७२५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे.४बंदनलिकेद्वारे ४२२०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करणे.४कालव्यावरील पाच उपसासिंचन योजना जून २०१९ पर्यंत पूर्ण करणे. 

टॅग्स :Waterपाणी