शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या सर्वसाधारण सभेत पेटले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:13 IST

सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देअधिकारी-पदाधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी सांगितले की, पाणीटंचाई उपाययोजनेंतर्गत जिल्ह्याला तीन टप्प्यामध्ये ६२३ वर बोअरवेल मंजूर आहेत. आज निम्मा उन्हाळा संपुष्टात आल्यानंतरही जिल्ह्यात मंजूर बोअरवेलपेक्षा निम्म्याही बोअरवेलची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ १५१ इतक्याच बोअरवेलची कामे पूर्ण झाली आहेत. तर यातील बोटावर मोजण्याइतपतच बोअरवेलला हॅन्डपंप बसविण्यात आले असून, या बोअरवेलच्या पाण्याचा नाममात्र नागरिकांनाच फायदा होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व गोष्टीसाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही जबाबदार आहेत. अध्यक्षांनी भीषण टंचाई लक्षात घेता टंचाईच्या काळात एकही आढावा सभा घेतली नाही किंवा टंचाईग्रस्त गावे, तालुक्यांना अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी भेटी घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडून ही कृती करण्यात आली नाही. पदाधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष असल्यामुळे अधिकाऱ्यांनीही आपल्या मनमर्जीपणाने कामे सुरू ठेवलीत व याचा फटका म्हणजे ग्रामीण जनतेला पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख टाकळीकर यांनी आजवर टंचाई उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामासोबतच करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सभागृहातील सदस्यांना दिली.सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी टंचाईच्या दृष्टिकोनातून जि.प.प्रशासनाने करावयाची उपाययोजना ही आज करण्यापेक्षा पूर्वीच का केली नाही? असा सवाल यावेळी उपस्थित केला. यावेळी भारती गोडबोले, मनोज तितरमारे, नंदा नारनवरे, उज्ज्वला बोढारे, सुरेंद्र शेंडे, नाना कंभाले, वंदना पाल, शांता कुमरे, नंदा लोहबरे, बबीता साठवणे, छाया ढोले आदी सत्तापक्ष व विरोधी पक्षातील सदस्यांनी पाणीप्रश्नावर आपापल्या सर्कलमधील गाऱ्हाणी सभागृहात मांडून, पदाधिकारी व अधिकाऱ्यांना यावर तोडगा काढण्याची मागणी केली.कुही, भिवापूर, रामटेकमध्ये एकही बोअरवेल नाहीसदस्या नंदा नारनवरे म्हणाल्या, भिवापूर तालुक्यात कुठलीच नदी, तलाव नाही. यामुळे येथील जनतेला पाण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांवर निर्भर राहावे लागते. मात्र, यानंतरही अद्यापपर्यंत भिवापूर तालुक्यात एकाही बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाली नाही. शांता कुमरे म्हणाल्या, रामटेक तालुक्याच्या एसडीओंनी जि.प.कडे चुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्या प्रस्तावात तालुक्याला पाणीटंचाई उपाययोजनेच्या अनुषंगाने कुठलीच आवश्यकता नसल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, वस्तुस्थितीत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, येथे टंचाई उपाययोजनांची कामे मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. तर तितरमारे म्हणाले की, निम्मा उन्हाळा संपुष्टात येऊनही कुही तालुक्यात एकाही बोअरवेलचे काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरWaterपाणी