शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

By नरेश डोंगरे | Updated: July 20, 2024 18:51 IST

दमदार पावसामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासनाची त्रेधातिरपट : हजारो प्रवाशांनाही फटका, अनेकांचे नियोजन बिघडले

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाला जबरदस्त तडाखा दिला. रेल्वे स्थानकाच्या आतमधील ट्रॅक नहर बनले तर मोरभवन बस स्थानक परिसराला तलावाचे स्वरूप आले. या स्थितीमुळे दोन्ही प्रशासनाची अक्षरश: त्रेधातिरपट उडाली. प्रवाशांनाही प्रचंड त्रास झाला.

मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून यावर्षी आतापर्यंत नागपुरात दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे साऱ्यांनाच मुसळधार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र, शनिवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस एवढा दमदार होता की त्याचा साऱ्यांनाच फटका बसला. रेल्वे आणि एसटी महामंडळाची तर या पावसामुळे अक्षरश: तारांबळ उडाली. रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये असलेले सर्वच्या सर्व ट्रॅक (रेल्वे रुळ) पाण्याखाली आले. अशा स्थितीत रेल्वे गाडीचे चाक घसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तातडीने एक्शन मोडवर आले.

विशेष म्हणजे, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. त्यासाठी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता (हावडा) या तीन लाईन आहेत. शनिवारी सकाळी ७ ते १० या वेळेत वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या या तीनही लाईनवर काही वेळेसाठी 'रेड सिग्नल्स' देण्यात आले. नागपूर शहराच्या जवळपास पोहचलेल्या सर्वच्या सर्व गाड्या आजुबाजूच्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. मॅन अन् मशिनरीजचा वापर करून रुळावरील पाणी काढण्यात आले. त्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी 'ट्रॅक'वर आले आणि सुमारे १०. ३० च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन बिघडले.

खबरदारीमुळे टळले कोट्यवधींचे नुकसान

एसटी महामंडळाच्या सीताबर्डीतील मोरभवन बस स्थानकाचा परिसर अक्षरश: तलाव बनला होता. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला मोरभवन स्थानकाची अशीच स्थिती झाली होती. बसस्थानकच नव्हे तर प्रांगणात उभ्या असलेल्या १३ बसेस पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामुळे त्या निकामी होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले होते. तो धडा घेत एसटीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीपासून स्थानकात उभ्या असलेल्या सर्वच्या सर्व बसेस बाहेर काढल्या. बसस्थानकातील संगणकांसह किंमती चिजवस्तू बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविल्या. मुक्कामी थांबलेल्या चालक-वाहकांसह अन्य स्टाफला तेथून बाहेर निघण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे स्थानकात प्रवाशांसाठी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खुर्च्या तेवढ्या पाण्यात बुडाल्या. दुसरे मोठे नुकसान टळले. 

२० हजारांवर एसटी प्रवाशांना फटकानागपूर जिल्ह्यातील एसटीच्या २० हजारांवर प्रवाशांना मुसळधार पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील गावोगावी जाणाऱ्या एसटीच्या १३,००७ किलोमिटरमधील एकूण २१५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटीची सर्वाधिक वाहतूक उमरेड आणि रामटेक तालुक्यात प्रभावित झाली. उमरेड आगारातून खेडोपाडी जाणाऱ्या ६८, तर काटोल आगारातून जाणाऱ्या ६२ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इमामवाडा आगारातील ३१, गणेशपेठ आगारातील १२, वर्धमान नगर १२, सावनेर ११, काटोल १० आणि घाटरोड आगारातील ९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ज्यामुळे प्रवाशांची तीव्र गैरसोय झाली. 

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस