शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

By नरेश डोंगरे | Updated: July 20, 2024 18:51 IST

दमदार पावसामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासनाची त्रेधातिरपट : हजारो प्रवाशांनाही फटका, अनेकांचे नियोजन बिघडले

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाला जबरदस्त तडाखा दिला. रेल्वे स्थानकाच्या आतमधील ट्रॅक नहर बनले तर मोरभवन बस स्थानक परिसराला तलावाचे स्वरूप आले. या स्थितीमुळे दोन्ही प्रशासनाची अक्षरश: त्रेधातिरपट उडाली. प्रवाशांनाही प्रचंड त्रास झाला.

मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून यावर्षी आतापर्यंत नागपुरात दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे साऱ्यांनाच मुसळधार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र, शनिवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस एवढा दमदार होता की त्याचा साऱ्यांनाच फटका बसला. रेल्वे आणि एसटी महामंडळाची तर या पावसामुळे अक्षरश: तारांबळ उडाली. रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये असलेले सर्वच्या सर्व ट्रॅक (रेल्वे रुळ) पाण्याखाली आले. अशा स्थितीत रेल्वे गाडीचे चाक घसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तातडीने एक्शन मोडवर आले.

विशेष म्हणजे, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. त्यासाठी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता (हावडा) या तीन लाईन आहेत. शनिवारी सकाळी ७ ते १० या वेळेत वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या या तीनही लाईनवर काही वेळेसाठी 'रेड सिग्नल्स' देण्यात आले. नागपूर शहराच्या जवळपास पोहचलेल्या सर्वच्या सर्व गाड्या आजुबाजूच्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. मॅन अन् मशिनरीजचा वापर करून रुळावरील पाणी काढण्यात आले. त्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी 'ट्रॅक'वर आले आणि सुमारे १०. ३० च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन बिघडले.

खबरदारीमुळे टळले कोट्यवधींचे नुकसान

एसटी महामंडळाच्या सीताबर्डीतील मोरभवन बस स्थानकाचा परिसर अक्षरश: तलाव बनला होता. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला मोरभवन स्थानकाची अशीच स्थिती झाली होती. बसस्थानकच नव्हे तर प्रांगणात उभ्या असलेल्या १३ बसेस पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामुळे त्या निकामी होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले होते. तो धडा घेत एसटीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीपासून स्थानकात उभ्या असलेल्या सर्वच्या सर्व बसेस बाहेर काढल्या. बसस्थानकातील संगणकांसह किंमती चिजवस्तू बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविल्या. मुक्कामी थांबलेल्या चालक-वाहकांसह अन्य स्टाफला तेथून बाहेर निघण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे स्थानकात प्रवाशांसाठी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खुर्च्या तेवढ्या पाण्यात बुडाल्या. दुसरे मोठे नुकसान टळले. 

२० हजारांवर एसटी प्रवाशांना फटकानागपूर जिल्ह्यातील एसटीच्या २० हजारांवर प्रवाशांना मुसळधार पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील गावोगावी जाणाऱ्या एसटीच्या १३,००७ किलोमिटरमधील एकूण २१५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटीची सर्वाधिक वाहतूक उमरेड आणि रामटेक तालुक्यात प्रभावित झाली. उमरेड आगारातून खेडोपाडी जाणाऱ्या ६८, तर काटोल आगारातून जाणाऱ्या ६२ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इमामवाडा आगारातील ३१, गणेशपेठ आगारातील १२, वर्धमान नगर १२, सावनेर ११, काटोल १० आणि घाटरोड आगारातील ९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ज्यामुळे प्रवाशांची तीव्र गैरसोय झाली. 

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस