शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
2
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
3
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
4
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
5
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
6
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
7
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
8
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
9
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
10
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
11
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
12
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
13
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
14
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
15
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
16
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
17
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
18
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
19
पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
20
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार

By शुभांगी काळमेघ | Updated: May 28, 2025 18:02 IST

पावसाच्या घाईत पेरणी नको: विदर्भात शेतकऱ्यांना मोठा इशारा!

शुभांगी काळमेघ नागपूर : विदर्भात यंदा मान्सून थोडा लवकर दाखल झाला असला, तरी पावसाचे प्रमाण अजूनही स्थिर नाही. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, पण हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस ‘मान्सूनपूर्व’ असून, यावर विश्वास ठेवून पेरणी करणे धोका पत्करण्यासारखे ठरू शकते.

काय आहे धोका?हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील शेतकऱ्यांनी जर आताच पेरणी सुरू केली, तर पुढील आठवड्यात पावसाची विश्रांती पडल्यास उगवलेले पीक कोरड्या हवामानामुळे नष्ट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

मृग नक्षत्राची वाट पाहा!८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार आहे. त्या काळात हवामान खात्याने अधिक स्थिर व नियमित पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, मृग नक्षत्रातच पेरणी करावी. किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करणे शहाणपणाचे ठरेल.

कृषी विभागाचा सल्ला

  • पावसावर भरवसा ठेवा, पण योग्य वेळेची वाट पहा
  • हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या
  • जमीन ओलसर असेल तेव्हाच पेरणी करा

शेतकऱ्यांनी सध्या हवामानाची स्थिती लक्षात घेऊन, घाई न करता, वैज्ञानिक पद्धतीने व वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. चुकीच्या वेळी पेरणी केल्यास, शेतीचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भfarmingशेतीFarmerशेतकरीAkolaअकोलाnagpurनागपूर