शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाची गाडी वेगात, १५ किलोमीटरचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:23 IST

वर्धा - देवळी मार्ग पूर्ण : देवळी ते कळंबपर्यंतच्या कामाचा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर

नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या भरभराटीचा मार्ग प्रशस्त करू पाहणाऱ्या वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचे १५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आज त्यासंबंधाची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली असून, या प्रकल्पाच्या कामाचा वेग लक्षात घेता पुढच्या दोन महिन्यांत देवळी ते कळंब रेल्वे स्थानकादरम्यानचे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून डॉ. विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ते सतत संपर्कात असतात. या पार्श्वभूमीवर, सरकारने या प्रकल्पाच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तसेच कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाता यावा यासाठी एक विशेष कक्ष निर्माण केला आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनोज साैनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसेच उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यावर लक्ष ठेवून असतात. डॉ. दर्डा यांचीही त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा होते. त्यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाची गाडी आता चांगलीच गतिमान झाली आहे.

प्रकल्पाचा आढावा

एकूण लांबी - २८४.६५ किमी

पूर्ण झालेल्या कामाची लांबी- १५ किमी

एकूण किंमत- ३४४५. ४८ कोटी

आजपर्यंतचा खर्च- १८१६.२८ कोटी (५२ टक्के)

झपाट्याने सुरू आहे काम

वर्धा - देवळी रेल्वे स्थानकादरम्यानचा १५ किलोमीटरचा टप्पा, तर देवळी - कळंब रेल्वेस्थानकादरम्यानचा २३.६१ किमीचा टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, या टप्प्यातील कामाची प्रगती बघता यावर्षीच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत, तर, पुढच्या २४६ किलोमीटरच्या टप्प्यातील कळंब नांदेडपर्यंतचे कामही झपाट्याने सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर