शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाची गाडी वेगात, १५ किलोमीटरचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:23 IST

वर्धा - देवळी मार्ग पूर्ण : देवळी ते कळंबपर्यंतच्या कामाचा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर

नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या भरभराटीचा मार्ग प्रशस्त करू पाहणाऱ्या वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचे १५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आज त्यासंबंधाची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली असून, या प्रकल्पाच्या कामाचा वेग लक्षात घेता पुढच्या दोन महिन्यांत देवळी ते कळंब रेल्वे स्थानकादरम्यानचे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून डॉ. विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ते सतत संपर्कात असतात. या पार्श्वभूमीवर, सरकारने या प्रकल्पाच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तसेच कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाता यावा यासाठी एक विशेष कक्ष निर्माण केला आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनोज साैनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसेच उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यावर लक्ष ठेवून असतात. डॉ. दर्डा यांचीही त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा होते. त्यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाची गाडी आता चांगलीच गतिमान झाली आहे.

प्रकल्पाचा आढावा

एकूण लांबी - २८४.६५ किमी

पूर्ण झालेल्या कामाची लांबी- १५ किमी

एकूण किंमत- ३४४५. ४८ कोटी

आजपर्यंतचा खर्च- १८१६.२८ कोटी (५२ टक्के)

झपाट्याने सुरू आहे काम

वर्धा - देवळी रेल्वे स्थानकादरम्यानचा १५ किलोमीटरचा टप्पा, तर देवळी - कळंब रेल्वेस्थानकादरम्यानचा २३.६१ किमीचा टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, या टप्प्यातील कामाची प्रगती बघता यावर्षीच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत, तर, पुढच्या २४६ किलोमीटरच्या टप्प्यातील कळंब नांदेडपर्यंतचे कामही झपाट्याने सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर