शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

हागणदारीमुक्ती चार राज्यात ‘वर्धा पॅटर्न’ राबविणार

By admin | Updated: May 12, 2014 00:34 IST

वर्धा निर्मल भारत ग्राम अभियानात वर्धा जिल्ह्याच्या कामाचे कौतुक राज्यस्तरावर करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट राज्यात एकमेव वर्धा जिल्ह्याने पूर्ण केले.

श्रेया केने - वर्धा निर्मल भारत ग्राम अभियानात वर्धा जिल्ह्याच्या कामाचे कौतुक राज्यस्तरावर करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट राज्यात एकमेव वर्धा जिल्ह्याने पूर्ण केले. यासाठी वर्धेला पुरस्कार देत हगणदारीमुक्तीकरिता राबविलेला पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियानात स्वच्छतेतून समृद्धीकडे जाणाच्या मार्गात अद्यापही हगणदारी मुक्त न झालेली गावे अडसर ठरत आहेत. केंद्र व राज्य शासन या उपक्रमाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे; मात्र जनजागृतीचा अभाव असल्याने गावे हगणदारी मुक्त करण्यात अडचणी येत आहेत. गावागावात शौचालयाची निर्मिती करण्यात येत आहे. या योजनेची शहरी भागात प्रभावी अंमलबजावणी होत असली तरी गावांमध्ये मात्र घाणीचे साम्राज्य दिसून येते. गावाची शिव सुरू होताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. हे अभियान राबवितानाच व्यापक जनजागृती करणेही गरजेचे ठरत असल्याचे दिसून येते. योजनेतील निकषात न बसल्यामुळे अनेक ग्रामस्थांना अनुदान यादीतून वगळण्यात आले. शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान राशी दिली जाते. बरेचदा बांधकाम पूर्ण न करता निधी परस्पर खर्च केला जाते. यामुळे योजनेच्या निकषात बदल करून बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुदान राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे झाले तरी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.