शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

वर्धा जिल्हा बँकेची तीन महिन्यात फेरचौकशी; दोषींवर गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:07 IST

आॅनलाईन लोमकतनागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेला घोटाळा गुरुवारी विधानसभेत गाजला. या घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात असल्याचे सांगत, पुन्हा चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी लावून धरली. याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तीन महिन्यात फेरचौकशी करण्याची घोषणा केली. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही ...

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

आॅनलाईन लोमकतनागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेला घोटाळा गुरुवारी विधानसभेत गाजला. या घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात असल्याचे सांगत, पुन्हा चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी लावून धरली. याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तीन महिन्यात फेरचौकशी करण्याची घोषणा केली. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी सांगितले.भाजपाचे डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत, वर्धा जिल्हा जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहारामुळे वर्धा जिल्हा परिषदेचे ९५ कोटी रुपये तर २ लाख ४० हजार खातेधारकांचे सुमारे ३५० कोटी रुपये बँकेत अडकून पडले असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक विविध तातडीच्या कामासाठी आपले पैसे काढण्यासाठी बँकेत जातात तेव्हा त्यांना रक्कम दिली जात नाही. त्यामुळे स्वत:च्या हक्काच्या पैशापासून ठेवीदार वंचित झाले असल्याचे सांगत, सरकारने यावर उपाय योजण्याची मागणी केली. सुधाकर कोहळे, वीरेंद्र जगताप यांनीही संबंधित मागणी लावून धरली. या बँकेची सरकारतर्फे चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, २००८ मध्ये तत्कालीन सरकारने चौकशी थांबविली, असे सांगत पुन्हा चौकशी करण्याची मागणी अतुल भातखळकर व सुधाकर कोहळे यांनी केली. समीर कुणावार यांनी जिल्हा बँक राज्य बँकेत विलीन करण्याची मागणी केली. सदस्यांची मागणी विचारात घेता, सहकारमंत्री देशमुख यांनी तीन महिन्यात फेरचौकशी करण्याची घोषणा केली.देशमुख यांनी सांगितले की, बँकेचे एकूण २ लाख १९ हजार ४०९ ठेवीदार असून, एकूण ३६४.२२ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत १.३४ कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. सद्यस्थितीत ठेवींच्या ५ टक्के व जास्तीत जास्त १५ हजार रुपये ठेवीदारांना परत केले जात आहेत. मुदतठेवींवर २५ टक्के व जास्तीत जास्त ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. वर्धा जिल्हा परिषदेच्या बँकेत ९३.९२ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. त्यापैकी ६.२५ कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. बँकेत १७० कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे नोव्हेंबर २०१७ चे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Subhash Deshmukhसुभाष देशमुख