शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

विदर्भवादी काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: August 3, 2016 02:39 IST

स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत.

चव्हाण, राणे, विखे-पाटील यांच्यावर टीका : ‘हायकमांड’कडे तक्रार करणार नागपूर : स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत. विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका घेणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर नेत्यांवर तोफ डागली आहे. हे आपले नेते नसून ते ज्युनिअर आहेत. वैयक्तिक स्वार्थासाठी हे नेते अखंड महाराष्ट्राची भूमिका घेत आहेत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, डॉ.सतीश चतुर्वेदी व डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणाऱ्या भाजपाविरोधात विधिमंडळात सर्वपक्षीय एकजूट झाली आहे. अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्याच्या मुद्यावरून शिवसेना व कॉंग्रेसदेखील एकत्र आल्याची चर्चा होती. कॉंग्रेसच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाला जोरदार विरोध केला. दुसरीकडे विदर्भातील कॉंग्रेसचे नेते मुत्तेमवार, राऊत व चतुर्वेदी यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे व याअगोदरदेखील त्यांनी जाहीरपणे मांडली आहे. मंगळवारी या तिन्ही नेत्यांची नागपुरात बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी स्वपक्षीय कॉंग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली. विदर्भातील काँग्रेसजनांचे मत जाणून न घेता चव्हाण, राणे व विखे पाटील यांनी विदर्भाला विरोध केला आहे. शिवसेनेसोबत अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्याचीदेखील तयारी केली होती. परंतु यासाठी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेतलेली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे, असे मत मुत्तेमवार, चतुर्वेदी व राऊत यांनी व्यक्त केले. अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्यासंदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी ‘हायकमांड’ची परवानगी घेतली नव्हती. शिवाय कॉंग्रेसने अद्याप वेगळ्या विदर्भाची मागणी सोडलेली नाही. परंतु सध्या आमचे लक्ष्य भाजपा सरकारविरोधात लढा हेच आहे. चव्हाण, राणे, विखे-पाटील यांची ‘हायकमांड’कडे तक्रार करणार असल्याचे विदर्भातील या तिघा कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) चव्हाण, राणे, विखेंमुळे काँग्रेस रसातळाला चव्हाण, राणे, विखे-पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नेहमीच विदर्भाच्या विरोधात राहिले आहेत. त्यांनी विदर्भाला अक्षरश: लुटले. आता काय १२०० लोक मेल्यानंतर वेगळा विदर्भ देणार का, असा सवाल विलास मुत्तेमवार यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे यांनी काँग्रेस संपविली. विखे-पाटलांना आहे ती जबाबदारी पेलणे जमत नाही. या नेत्यांमुळे काँग्रेस रसातळाला गेली आहे, असा आरोप विदर्भवादी कॉंग्रेस नेत्यांनी केला. मुख्यमंत्रीदेखील विदर्भाला विसरले निवडणुकांच्या वेळी विदर्भातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईतील मलबार हिल येथे रहायला गेले व ते विदर्भाच्या मुद्याला विसरले. विदर्भाच्या मुद्यावर नागरिकांना आश्वासन देऊन आता मौन पाळत आहेत, अशी टीका नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांनी केली.