शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? ६०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? वडेट्टीवारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:25 IST

हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. परंतु, कायदे रद्द करायचे होतेच तर मग इतकी महिने वाट का पाहिली? यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी : वडेट्टीवार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. देशात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना वापस घेण्यात येणार असल्याचे मोदींनी देशवासीयांना सांगितले. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी घरी जावे, गुरु नानक जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत असावे, असेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा बळी गेला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदींना माफी मागावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. परंतु,  कायदे रद्द करायचे होतेच तर मग ९ महिने वाट का पाहिली? पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. परंतु, इतकी महिने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुकांना सामोर ठेऊन तर हे कायदे रद्द करण्यात नाही आले ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इतकी महिने शेतकरी थंडी, ऊन, पावसात आंदोलन करत होता, एकेका शेतकऱ्याचा जीव जात होता. त्यावेळी हे कायदे रद्द करण्याचं का सुचलं नाही. आता शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं आहे, त्यात समोर उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीत सत्ता जाऊ नये, केवळ हाच उद्देश हे कायदे मागे घेण्यामागे दिसतो आहे. कारण, निवडणुका तोंडावर आल्या की दरवाढ, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायचे, काही निर्णय घ्यायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा वाढवायचे, हेच हे सरकार करत आलं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनेही आंदोलन केलं होतं. काँग्रेसने समर्थन केलं. रस्त्यावर उतरली. आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही या कायद्याला विरोध केला. यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी टाकली. आंदोलन चिरडण्याचे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांच्या संघर्षाचं यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल, दिल्लीतील सरकार जाईल म्हणूनच सरकारला झुकावं लागलं, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीagitationआंदोलन