शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? ६०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? वडेट्टीवारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:25 IST

हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. परंतु, कायदे रद्द करायचे होतेच तर मग इतकी महिने वाट का पाहिली? यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी : वडेट्टीवार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. देशात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना वापस घेण्यात येणार असल्याचे मोदींनी देशवासीयांना सांगितले. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी घरी जावे, गुरु नानक जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत असावे, असेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा बळी गेला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदींना माफी मागावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. परंतु,  कायदे रद्द करायचे होतेच तर मग ९ महिने वाट का पाहिली? पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. परंतु, इतकी महिने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुकांना सामोर ठेऊन तर हे कायदे रद्द करण्यात नाही आले ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इतकी महिने शेतकरी थंडी, ऊन, पावसात आंदोलन करत होता, एकेका शेतकऱ्याचा जीव जात होता. त्यावेळी हे कायदे रद्द करण्याचं का सुचलं नाही. आता शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं आहे, त्यात समोर उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीत सत्ता जाऊ नये, केवळ हाच उद्देश हे कायदे मागे घेण्यामागे दिसतो आहे. कारण, निवडणुका तोंडावर आल्या की दरवाढ, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायचे, काही निर्णय घ्यायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा वाढवायचे, हेच हे सरकार करत आलं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनेही आंदोलन केलं होतं. काँग्रेसने समर्थन केलं. रस्त्यावर उतरली. आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही या कायद्याला विरोध केला. यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी टाकली. आंदोलन चिरडण्याचे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांच्या संघर्षाचं यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल, दिल्लीतील सरकार जाईल म्हणूनच सरकारला झुकावं लागलं, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीagitationआंदोलन