शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? ६०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? वडेट्टीवारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:25 IST

हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. परंतु, कायदे रद्द करायचे होतेच तर मग इतकी महिने वाट का पाहिली? यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी : वडेट्टीवार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. देशात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना वापस घेण्यात येणार असल्याचे मोदींनी देशवासीयांना सांगितले. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी घरी जावे, गुरु नानक जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत असावे, असेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा बळी गेला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदींना माफी मागावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. परंतु,  कायदे रद्द करायचे होतेच तर मग ९ महिने वाट का पाहिली? पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. परंतु, इतकी महिने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुकांना सामोर ठेऊन तर हे कायदे रद्द करण्यात नाही आले ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इतकी महिने शेतकरी थंडी, ऊन, पावसात आंदोलन करत होता, एकेका शेतकऱ्याचा जीव जात होता. त्यावेळी हे कायदे रद्द करण्याचं का सुचलं नाही. आता शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं आहे, त्यात समोर उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीत सत्ता जाऊ नये, केवळ हाच उद्देश हे कायदे मागे घेण्यामागे दिसतो आहे. कारण, निवडणुका तोंडावर आल्या की दरवाढ, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायचे, काही निर्णय घ्यायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा वाढवायचे, हेच हे सरकार करत आलं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनेही आंदोलन केलं होतं. काँग्रेसने समर्थन केलं. रस्त्यावर उतरली. आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही या कायद्याला विरोध केला. यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी टाकली. आंदोलन चिरडण्याचे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांच्या संघर्षाचं यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल, दिल्लीतील सरकार जाईल म्हणूनच सरकारला झुकावं लागलं, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीagitationआंदोलन