शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक

By कमलेश वानखेडे | Updated: December 7, 2023 17:04 IST

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला.

नागपूर : विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्हे उध्वस्त झाले. मात्र, सरकारने एक हजार तालुक्यांमध्ये मदतीसाठी हात वर केले. सरकारकडून शेतकऱ्यांना तीतडीच्या मदतीची अपेक्षा असताना पूर्णत: पंचनामे देखील झाले नाहीत. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नव्हता. नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी : फडणवीस

केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांनी मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसृश्य जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हाजर कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

फडणवीस म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ