शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक

By कमलेश वानखेडे | Updated: December 7, 2023 17:04 IST

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला.

नागपूर : विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्हे उध्वस्त झाले. मात्र, सरकारने एक हजार तालुक्यांमध्ये मदतीसाठी हात वर केले. सरकारकडून शेतकऱ्यांना तीतडीच्या मदतीची अपेक्षा असताना पूर्णत: पंचनामे देखील झाले नाहीत. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नव्हता. नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी : फडणवीस

केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांनी मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसृश्य जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हाजर कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

फडणवीस म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ