शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक

By कमलेश वानखेडे | Updated: December 7, 2023 17:04 IST

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला.

नागपूर : विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्हे उध्वस्त झाले. मात्र, सरकारने एक हजार तालुक्यांमध्ये मदतीसाठी हात वर केले. सरकारकडून शेतकऱ्यांना तीतडीच्या मदतीची अपेक्षा असताना पूर्णत: पंचनामे देखील झाले नाहीत. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नव्हता. नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी : फडणवीस

केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांनी मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसृश्य जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हाजर कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

फडणवीस म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ