शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक

By कमलेश वानखेडे | Updated: December 7, 2023 17:04 IST

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला.

नागपूर : विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्हे उध्वस्त झाले. मात्र, सरकारने एक हजार तालुक्यांमध्ये मदतीसाठी हात वर केले. सरकारकडून शेतकऱ्यांना तीतडीच्या मदतीची अपेक्षा असताना पूर्णत: पंचनामे देखील झाले नाहीत. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नव्हता. नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी : फडणवीस

केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांनी मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसृश्य जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हाजर कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

फडणवीस म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ