शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपावरुन विजय वड्डेटीवार संतापले; भाजपवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:37 IST

शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या खुलाशांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

नागपूर- देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या 'प्रणव : माय फादर' या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, 'प्रणव मुखर्जी हे ज्येष्ठ नेते होते आणि काँग्रेसने त्यांच्या क्षमतेला न्याय दिला. आता शर्मिष्ठाजी असे का बोलत आहेत? भाजप नेहमीच तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या लोकांना बदनाम करण्याचा छुपा अजेंडा राबवत असते, असा आरोपही त्यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींचे कौतुक करताना भाजपवर आरोप केले. ते म्हणाले, 'राहुल हे अतिशय प्रामाणिक नेते आहेत. भाजप राहुल गांधींना नेहमीच घाबरते. रणनीतीनुसार भाजप शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या माध्यमातून राहुल गांधींना बदनाम करत आहे, असंही वड्डेटीवार म्हणाले.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलं आहे की, माजी कॅबिनेट मंत्री आणि पक्षाचे संपर्क विभाग प्रमुख अजय माकन यांनी २७ सप्टेंबर २०१३ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी सहभागी झाले होते आणि त्यांनी प्रस्तावित सरकारी अध्यादेशाला पूर्ण बकवास म्हटले होते. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसून त्यांनी अध्यादेशाची प्रत फाडली. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असेही नमूद केले आहे की, त्यांच्या वडिलांनी त्यांना असेही सांगितले होते की कदाचित राहुल गांधींसाठी राजकारण नाही आणि त्यांची राजकीय समज कमी आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी