शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

उपराजधानीचा सजग प्रहरी काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:36 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ठळक मुद्देज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. १६ जुलैपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नागपुरातील सामाजिक चळवळींना आधार देणारा, त्यांचे पालकत्व स्वीकारणारा आणि प्रसंगी कुठलीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवणारा निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. उमेशबाबूंच्या निधनाने केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील सामाजिक चळवळी आणि कार्यकर्त्यांना दीर्घकाळपर्यंत पोरकेपणा जाणवणार आहे.उमेशबाबू यांचा जन्म १७ एप्रिल १९३३ रोजी हरदा मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे मूळ गाव होलीपुरा त. बह, जि. आग्रा उत्तर प्रदेश होते. नागपुरातून त्यांनी शिक्षण घेतले आणि येथेच स्थायिक झाले. उमेशबाबू हे नागपूरचे सजग प्रहरी म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासूनच ते आंदोलनात सक्रिय झाले. पुढे पत्रकार म्हणून त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली. पत्रकार असतानाच ते कामगारांच्या चळवळीत सामील झाले. त्यांचा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग होता. समाजात कुणावरही, कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर सर्वात अगोदर आवाज उचलणारे व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे होते. बाबूजी म्हणून लोक त्यांना ओळखायचे. पुढे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अनेक भोंदूबाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. सामाजिक कार्यासोबतच पत्रकारिता, नाट्य, साहित्य अशा विविध क्षेत्रात ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत लढणारे ते खऱ्या अर्थाने एक सजग प्रहरी होते.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर