शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

उपराजधानीचा सजग प्रहरी काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:36 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ठळक मुद्देज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. १६ जुलैपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नागपुरातील सामाजिक चळवळींना आधार देणारा, त्यांचे पालकत्व स्वीकारणारा आणि प्रसंगी कुठलीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवणारा निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. उमेशबाबूंच्या निधनाने केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील सामाजिक चळवळी आणि कार्यकर्त्यांना दीर्घकाळपर्यंत पोरकेपणा जाणवणार आहे.उमेशबाबू यांचा जन्म १७ एप्रिल १९३३ रोजी हरदा मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे मूळ गाव होलीपुरा त. बह, जि. आग्रा उत्तर प्रदेश होते. नागपुरातून त्यांनी शिक्षण घेतले आणि येथेच स्थायिक झाले. उमेशबाबू हे नागपूरचे सजग प्रहरी म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासूनच ते आंदोलनात सक्रिय झाले. पुढे पत्रकार म्हणून त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली. पत्रकार असतानाच ते कामगारांच्या चळवळीत सामील झाले. त्यांचा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग होता. समाजात कुणावरही, कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर सर्वात अगोदर आवाज उचलणारे व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे होते. बाबूजी म्हणून लोक त्यांना ओळखायचे. पुढे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अनेक भोंदूबाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. सामाजिक कार्यासोबतच पत्रकारिता, नाट्य, साहित्य अशा विविध क्षेत्रात ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत लढणारे ते खऱ्या अर्थाने एक सजग प्रहरी होते.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर