शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विधानभवन सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:28 IST

येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.

ठळक मुद्देविधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू : सचिव स्तरावरील अधिकारी १ जुलैला येणार

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईहून कर्मचारी दाखल झाले असून सचिव स्तरावरील अधिकारी हे १ जुलैला येतील. विधिमंडळ सचिवालयाचे ग्रंथालय, प्रश्न शाखा सुरू झाल्या आहेत. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून आॅनलाईन तारांकित प्रश्न स्वीकारण्यासही सुरुवात झाली आहे. २८ जूनपासून लक्ष्यवेधी स्वीकारण्यात येतील. विविध कागदपत्रे, फायली तयार करण्यात येत आहे. तीन आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज तहकूब होईल. कामाचे तास वाढावे, जास्तीत जास्त कामकाज व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची परंपरा खंडित करून इतर कामकाजातही गोंधळ होणार नाही, यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते. विधानभवनात रेलचेल वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे.ग्रंथालय सुरूअधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळाचे ग्रंथालय सुरू झाले आहे. ग्रंथालयात विधिमंडळाशी संबंधित स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आतापर्यंतचे जवळपास सर्व संदर्भ ग्रंथालयात उपलब्ध आहे. पीएचडी करणाऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ग्रंथालयाचे कामकाज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.चौथे पावसाळी अधिवेशनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील पहिले पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. यापूर्वी तीन पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले होते. त्यावेळी अधिवेशन २५ दिवस चालले होते. त्यानंतर वसंतराव नाईक मुुख्यमंत्री असताना १९६६ ला पावसाळी अधिवेशन झाले होते. २६ दिवस अधिवेशन चालले होते. त्यानंतर १९६८ ला पुन्हा पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळीही वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर