शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्टीलच्या पुरवठ्यासाठी तयार होणार विदर्भातील पहिला मिनरल कॉरिडोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:44 IST

नवेगाव मोरे ते हेडरीपर्यंत ८५ किलोमीटरचा ग्रीन फिल्ड मार्ग : वाहतुकीला मिळणार गती

वसीम कुरेशी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरजागडपासून विस्तारित समृद्धी महामार्गापर्यंत ८५ किलोमीटरचा विदर्भातील पहिला मिनरल कॉरिडोर तयार होत आहे. या नव्या कॉरिडोरच्या निर्मितीनंतर सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्याने दोन तासांत कोनसरीला पोहोचणारे स्टील एका तासात पोहोचविणे शक्य होणार आहे.

विदर्भाच्या दुर्गम भागात समावेश असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे अर्थकारण या प्रकल्पामुळे बदलणार आहे. सुरजागड माईन्स ते चंद्रपूर हायवेला जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नवा मिनरल कॉरिडोर तयार करणार आहे. सध्या मालाची वाहतूक हेडरी या एकेरी मार्गाने कोनसरी इंडस्ट्रीयल एरियापर्यंत होते. या मार्गाने कोनसरीपर्यंत १०० किलोमीटर अंतर पार करावे लागते. 

या मार्गाने दोन ट्रक विरुद्ध दिशेने आल्यास अडचण होते. त्यामुळे या नव्या ग्रीन कॉरिडोरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या ८५ किलोमीटरच्या कॉरिडोरमध्ये कुठलाही पूल व अंडरपास राहणार नाही. घनदाट जंगलातून जाणारा हा टु लेन मार्ग राहणार आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची वाहतूक जलदगतीने होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

डीपीआर तयार१० मीटर रुंदीच्या या दोन लेनच्या मार्गाचा डीपीआर तयार करण्यात येऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सूत्रांनुसार या प्रकल्पासाठी निधीचा कुठलाही तुटवडा नाही. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या कॉरिडोरचे काम सुरू होऊ शकते. समृद्धी महामार्गाचा विस्तार झाल्यानंतर हे स्टील इतर भागात जलदगतीने पाठविता येणार आहे. मिनरल कॉरिडोर चंद्रपूर हायवेला नवेगाव मोरेसोबत जोडण्यात येणार असून, विस्तारित समृद्धी महामार्गाला सेलडोहपासून कनेक्ट होणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ