शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय  पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:27 IST

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.पु. य. देशपांडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कादंबरी पुरस्कार यंदा विद्याधर बनसोड (चंद्रपूर) यांना ‘मुक्काम पोस्ट तेढा’ कादंबरीसाठी घोषित झाला असून दिवाकर मोहनी यांना ‘शुद्ध लेखनाचे तत्त्वज्ञान’ या ग्रंथासाठी डॉ. वा.वि. मिराशी स्मृतिपुरस्कार घोषित झाला आहे. यासोबतच विराग श्रीकृष्ण पाचपोर यांच्या ‘देवरस पर्व’, संजय आर्वीकर यांना ‘विश्वांगण’ या ग्रंथासाठी, मीनल येवले यांच्या ’मी मातीचे फुल’ या काव्यसंग्रहासाठी, मदन देशपांडे (अमरावती) यांना ‘हृदयस्पर्शी या ग्रंथासाठी, ‘वैदर्भीय संशोधक’ या ग्रंथासाठी डॉ. राजेंद्र डोळके, ‘राष्ट्रसंतांची विचारधारा’ या ग्रंथासाठी डॉ. बाळ पदवाड यांना तर अबोली व्यास यांना संस्कृत महाकाव्य सृष्टीला महाराष्ट्राचे योगदान या ग्रंथासाठी पुरस्कार घोषित झाला आहे. कहाण्या या नाटकासाठी अरविंद विश्वनाथ (अकोला), पीळ या काव्यसंग्रहासाठी सुनील यावलीकर (अमरावती) आणि माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहासाठी विशाल इंगोले (लोणार) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.याशिवाय पत्रकार मंजुषा जोशी, रवींद्र इंगळे चावरेकर (बुलडाणा), डॉ. सतीश पावडे (वर्धा) यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच विजय प्रकाशन, माधवी कुंटे (मुंबई) आणि विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेस यंदाचा विशेष शाखेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाचा यंदाचा ९७ वा वर्धापनदिन समारंभ १९ जानेवारी रोजी होईल. त्यावेळी हे पुरस्कार प्रदान केले जातील.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर