शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

सरकारच्या कामगिरीवर विदर्भवादी असमाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 11:54 IST

Vidarbha Nagpur News मागील वर्षभरात कोरोनाचे प्रमुख संकट समोर आले असले तरी सरकारमध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यातूनच विदर्भावर अन्याय झाला असल्याची भावना विदर्भवाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविदर्भावर अन्याय केल्याची भावना विकासदेखील हरविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी शासनाला एक वर्ष पूर्ण होत असताना विदर्भवाद्यांमध्ये सरकारबाबत नाराजीचा सूर आहे. मागील वर्षभरात कोरोनाचे प्रमुख संकट समोर आले असले तरी सरकारमध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यातूनच विदर्भावर अन्याय झाला असल्याची भावना विदर्भवाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षभरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावणे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाकडे झालेले दुर्लक्ष, विदर्भातील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव, अतिवृष्टी झाली असतानादेखील सरकारकडून त्वरित मदत न देणे इत्यादी मुद्दे विदर्भवाद्यांनी मांडले आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक मंत्री शासनात महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. मात्र मुंबई व पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांप्रमाणे त्यांनी स्वतःच्या प्रदेशाचे मुद्दे लावून धरले नाही. हे सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचा सूर आहे.

सरकारकडे दिशाच नाही

तसे पाहिले तर हे वर्ष कोणत्याही सरकारसाठी आव्हानात्मकच होते. या गंभीर स्थितीत योग्य नियोजन अपेक्षित होते. मात्र सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले. केंद्र शासनाने अनलॉक सुरू केल्यानंतर राज्य शासनाकडून ठोस पावलांची अपेक्षा होती. मात्र सरकारकडे ना ब्ल्यू प्रिंट दिसून आली ना योग्य दिशा. विदर्भावर तर सरकारने अन्यायाची परंपरा सुरूच ठेवली आहे. दुर्लक्ष तर आहेच, मात्र त्याहून पुढे जात विदर्भ वैधानिक विकास मंडळाबाबत उदासीनता दाखविली. शिवाय कोरोनाचे कारण समोर करत विदर्भात अधिवेशनदेखील घेण्याचे टाळले. विदर्भाच्या प्रश्नांबाबत येथील मंत्रीदेखील बोलू शकत नाही हे या सरकारमधील मोठे दुर्दैव आहे.

-श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ता, महाराष्ट्र

विदर्भाचा विकासच हरवला

मागील सरकारच्या कार्यकाळात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेतेदेखील शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचे दाखवत शेतांना भेटी देत होते. मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा विसर पडला. विदर्भातील कास्तकारांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. विदर्भाकडे दुर्लक्ष करुन सरकारने विदर्भद्वेष दाखविला आहे. राज्यात नोकरभरती बंद करण्याचा आदेश काढल्याने विदर्भातील तरुणांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. सोबतच विदर्भाचा विकासनिधी ६९ टक्क्यांनी कमी केला. यामुळे विदर्भाचा विकासच हरविला आहे. इतर पातळ्यांवरदेखील सरकारने भरीव कार्य केलेले नाही.

-राम नेवले, संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती

औद्योगिकीकरणाकडे दुर्लक्ष

महाविकास आघाचीच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाले याबाबत त्यांचे अभिनंदन. विशेषतः कोरोनाच्या कालावधीत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी संयमित भूमिका घेतली. मात्र मॅग्नेटिक महाराष्ट्रदरम्यान झालेले १५ हजार कोटींचे करार पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले. वर्षभरात उद्योगमंत्री व मुख्यमंत्री दोघांनीही विदर्भाच्या औद्योगिकीकरणावर काहीच भाष्य केले नाही. विदर्भात बेरोजगारी वाढली आहे. शिकलेले मुल-मुली बाहेर जात आहेत. हा मुद्दा गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे. एका कोपऱ्यातून राज्याचे नियोजन होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी अनेक भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्याचा विचार करावा.

-श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ज्ञ

टॅग्स :Vidarbhaविदर्भ