शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:05 IST

अय्यर यांनी १२ वर्षांपूर्वी अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले होते.

नागपूर : ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार व अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर (वय ७४) यांचे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उपचार सुरू होते. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता शंकरनगर येथील निवासस्थानाहून निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात प्रियदर्शन व हर्षवर्धन ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा आप्तपरिवार आहे.

अय्यर यांनी १२ वर्षांपूर्वी अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी संस्थेला नावारूपात आणण्यात मोठे योगदान दिले. २०२२ मधील साहित्य संमेलनासह त्यांनी नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. अय्यर यांच्या ‘शुद्ध वेदनांची गाणी, कन्याकोलम आणि अजन्मा या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या लिखाणालाही वाचकांची पसंती लाभली होती. अय्यर यांचे खुळी बोगनवेल, सोन्याचे दरवाजे आणि किनखापी मोर हे कथासंग्रह, ‘सनान रे बोंद्र्या’ हा वऱ्हाडी कथा संग्रह, ‘चांदणचुरा’ व ‘काही शुभ्र कमळे’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘खुळी बोगनवेल’, ‘किनखापी मोर’ या कथासंग्रहांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका, कथा व लेख लिहिले आहेत. मेडिको सोशल वर्कर म्हणून काम केलेल्या अय्यर या राज्य शासनाच्या एड्स नियंत्रण सोसायटीवर अनेक वर्षे कार्यरत होत्या. त्या राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कार समिती तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या होत्या. 

टॅग्स :nagpurनागपूर