शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

नागपुरात आकाशाला भिडले भाज्यांचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:48 IST

यावर्षी भीषण गर्मी आणि लगतच्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूरलगतच्या भागातून आणि अन्य शहरांतून सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. महाग भाज्यांची खरेदी शक्य नसल्यामुळे गृहिणी कडधान्याचा जास्त उपयोग करीत आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीबाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देजुलैपर्यंत दिलासा नाही : स्थानिक व बाहेरून आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी भीषण गर्मी आणि लगतच्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूरलगतच्या भागातून आणि अन्य शहरांतून सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. महाग भाज्यांची खरेदी शक्य नसल्यामुळे गृहिणी कडधान्याचा जास्त उपयोग करीत आहेत.किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीबाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.नागपुरात स्थानिक आणि बाहेरील उत्पादकांकडून आवक अर्ध्यावर आली आहे. पूर्वी कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या लहानमोठ्या १५० ते १७५ गाड्या येत होत्या. पण सध्या आवक ६० ते ७० गाड्यांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या ३० टक्के महागल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात भाव कमीच आहेत. यावर्षी तपत्या उन्हातही प्रारंभी स्थानिक उत्पादकांकडून आवक चांगली होती. पण १५ मेनंतर स्थिती बदलली. भाज्यांची आवक कमी असल्यामुळे भाव वाढतातच. सध्या ओडिशा, दक्षिण भारत, मुलताई, संगमनेर, छिंदवाडा, नांदेड या भागातून भाज्यांची आवक आहे.महाजन म्हणाले, यावर्षी पाऊस वेळेवर येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरल्यास शेतींची कामे लवकर पूर्ण होऊन भाज्यांची आवक जुलैच्या अखेरपर्यंत वा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत गृहिणींना भाज्या महागच खरेदी कराव्या लागतील.किरकोळमध्ये भाज्या महागचकॉटन मार्केटमधून भाज्या खरेदी करून गल्लीबोळात आणि किरकोळ बाजारात विक्री करणाºया विक्रेत्यांकडे भाज्या महागच असतात. विविध भागात ज्यांची अस्थायी वा पक्की दुकाने आहेत, ते विक्रेते नफा जोडून विक्री करीत आहेत. त्यांचा नफा २० ते २५ टक्के असतो. अशा स्थितीत कॉटन मार्केटमध्ये भावात ३० टक्क्यांची वाढ झाल्यानंतर किरकोळमध्ये ग्राहकांना ४५ ते ५५ टक्के जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात.दुधाची आवक कमी होण्याचा अंदाजसरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी कन्हान भागात दूध उत्पादक शेतकºयांनी कॅनमधून दूध रस्त्यावर ओतले. हे आंदोलन मोठे होण्याच्या शक्यतेने पुढील काही दिवसात नागपुरात दुधाची टंचाई होऊन दर वाढू शकतात.कॉटन मार्केटमध्ये भावभाजीपाला  भाव (किलो)टोमॅटो १५-२० रु.फुलकोबी २० रु.वांगे २० रु.हिरवी मिरची ३० रु.कोथिंबीर ४०-५० रु.सिमला मिरची ३०-४० रु.भेंडी ३०-४० रु.टोंडले ५० रु.बीन्स ४० रु.कोहळे २० रु.कारले ४० रु.कैरी ३० रु.(किरकोळ बाजारात भाव २० ते २५ टक्के जास्त असू शकतात.)

टॅग्स :vegetableभाज्याnagpurनागपूर