शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात आठवड्यात उतरले भाज्यांचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 20:02 IST

Vegetable prices down, Nagpur News गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते.

ठळक मुद्देकिरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोवर : कोथिंबीर १२० रुपये

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते. सध्या मिरची ६० तर कोथिंबीर १०० ते १२० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यात पालक भाजीचे भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सध्या ३० रुपयांपर्यंत उतरले आहेत. वांगे, फूलकोबी, पत्ताकोबीचे भाव आटोक्यात आहेत. स्वयंपाकघरात कमी किमतीच्या भाज्यांची रेलचेल दिसून येत आहेत.फूलकोबी काही प्रमाणात औरंगाबाद आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून येत आहे. पावसामुळे कोथिंबीर शेतातच खराब झाल्याने अजूनही आवक फार कमी आहे. त्यामुळे भाव १०० ते १२० रुपयांदरम्यान आहे. सध्या लातूर, बुलडाणा, नांदेड येथून कोथिंबीर तर लवकी भिलई, राजनांदगाव येथून येत आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली असून पीक ऑक्टोबरअखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील. सध्या कॉटन मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या ३० ते ३५ गाड्यांच्या तुलनेत आवक दुप्पट झाली आहे. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. याशिवाय कळमना सब्जी मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्यांची आवक आहे. सध्या दोन्ही ठोक बाजारात शहराला होणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत पुरेशी आवक आहे.

शनिवारी किरकोळमध्ये भाज्यांचे  भाव कोथिंबीर १०० ते १२०, हिरवी मिरची ५०, टमाटर ४०, वांगे २०, सिमला मिरची ७० ते ८०, तोंडले ५०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी २५ ते ३०, दोडके ४० ते ५०, लवकी ३०, कोहळे ३० ते ३५, चवळी शेंग ४० ते ५०, गवार ५०, चवळी भाजी ४० ते ५०, पालक ३० ते ४०, मेथी ७० ते ८०, परवळ ६० ते ७०, कारले ५०, भेंडी ४० ते ५०, काकळी ३०, गाजर ५०, मुळा ४०.

टॅग्स :vegetableभाज्याnagpurनागपूर