शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

नागपुरात वीर बजरंगी दलाने लावले गाढवांचे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:42 IST

व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते.

ठळक मुद्देजनावरांवर अत्याचार : विरोधाची ही कुठली पद्धत?

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते.हे कार्यकर्ते अगदी सकाळीच गांधीबाग उद्यानात पोहोचले. येथे त्यांनी व्हॅलेंटाईन डे ला विरोध दर्शवित जोरदार नारेबाजी केली. यानंतर गाढवांना शोधून त्यांच्या गळात माळा टाकण्यात आल्या. या कार्यकर्त्यांनी या मुक्या जनावरांचा अक्षरश: छळ करीत त्यांना परिसरात फिरवले. व्हॅलेंटाईन डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे आणि आपले तरुण उगाच या दिवसाच्या उदात्तीकरणात गुंतले आहेत. त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत असल्याचे दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु अशा विरोधासाठी जनावरांचे हाल का करता, या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे कुठलेच उत्तर नव्हते.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेnagpurनागपूर