शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:09 IST

अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. 

ठळक मुद्देतगड्या शिष्टमंडळापुढे व्यक्त केली होती भावना : रा.सू. गवई, विजय दर्डा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली होती भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. रविवार २७ आॅगस्ट २००० रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नापूरला जहीर सभा होती. ते शनिवारी २६ तारखेलाच नागपूरला आले होते. राजभवनावर ते थांबले होते. तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात काँग्रेस खासदरांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. रिपाइंचे ज्येष्ठ नेते व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई, माजी खासदार विजय दर्डा , माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वातील एका तगड्या शिष्टमंडळाने राजभवनावर त्यांची भेट घेतली व चर्चा केली. उद्याच्या नागपूरच्या जाहीरसभेत पंतप्रधनांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असे आवाहन शिष्टमंडळाने केले होते. तेव्हा पंतप्रधान असलेल्या वाजपेयी यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता विदर्भवाद्यांचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेतले होते. विलास मुत्तेमवार यांनी त्या चर्चेचे प्रास्ताविक केले. विजय दर्डा तेव्हा वाजपेयींना म्हणाले ‘आपण चांगल्या मूडमध्ये आहात. विदर्भ राज्य देण्याची तुमची इच्छा आहे, तुमच्या डोळ्यात ते दिसते आहे. विदर्भाच्या जनभावना समजून घ्या आणि विदर्भाचा भरभराटीचा मार्ग प्रशस्त करा. नागपुरात आपण तशी घोषणा करा, तुमचा हा आशिर्वाद विदर्भाचे लोक सदैव लक्षात ठेवतील.’त्यावर वाजपेयी म्हणाले की, एका राज्याच्या निर्मितीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व विदर्भात आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भाचा ठराव समत झालेला नाही. सर्वांची सहमती होवो म्हणून तीन नवीन राज्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातही तसे झाले तर माझे काम सोपे होईल. विदर्भ राज्य झाले नाही, याचे शल्य मला बोचते.विदर्भवाद्यांच्या या तगड्या शिष्टमंडळात ज्येष्ठ विदर्भवादी नेते, टी.जी. देशमुख, शंकरराव गडाम, बनवारीलाल पुरोहित, बाळकृष्ण वासनिक, सदानंद फुलझेले, उमाकांत रामटेके, प्रा. हरीभाऊ केदार, नितीन राऊत, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, देवसरकर, सुरेश देवतळे, सेवक वाघाये, गोविंदराव वंजारी, किशोर काशीकर, अशोक धवड, दमयंती देशभ्रतार, डॉ. मंशा-ऊर रहेमान, अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश गजभिये, हरगोविंद बजाज, बसंतलाल शॉ, शेख हुसैन, गोविंद रेणू, एन.के. सारडा, प्रकाश वाधवानी, आदर्श डागा, उमेश चौबे, रामराव वाघाळे, रमण पैगवार, रीना रॉय आदी उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVidarbhaविदर्भ