शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करा!

By admin | Updated: May 12, 2014 01:01 IST

भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत.

 नागपूर : भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत. अशावेळी परिवर्तनवाद्यांनीसुद्धा या संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करावा. नवभांडवली जागतिकीकरणाचं,नव-साम्राज्यवाद्यांच्या उदारीकरणाचं आणि खासगीकरणाचं आक्रमण उद्ध्वस्त करण्यासाठी याचा उपयोग करा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्यमाने आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि निळाई सामाजिक व सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णचंद्र बुटी हॉल रामदासपेठ येथे आयोजित आंबेडकरी काव्यसंगितीला सुरुवात झाली. उद्घाटनीय कार्यक्रमात डॉ. मनोहर यांनी बीजभाषण केले. साहित्यिक अशोक बुरबुरे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. प्रदीप आगलावे, राहुल दहीकर, प्रा. सतेश्वर मोरे प्रमुख अतिथी होते. डॉ. मनोहर म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि माध्यमक्रांतीने इहवाद, बुद्धिवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधूता या आधुनिक मूल्यांचा महाप्रकल्प अमान्य केलेला आहे. नवभांडवलशाहीच्या उदारीकरणाने आणि खासगीकरणाने जगाचं रूपांतर हृदयशून्य बाजारपेठेत केलेले आहे. मानवी मूल्यांना पदच्युत करून त्यांच्याजागी अर्थमूल्यांची प्रस्थापना केली जात आहे. या नवभांडवली उदारीकरणामुळे परिवर्तनवादी माणूस उदास व्हायला लागला आहे. परंतु हा संक्रमणाचा काळ आहे. तो पाहुण्यासारखा असतो. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीतील सैनिकांचे हे निराश होणे प्रस्थापितांच्या दारात झोळी घेऊन जात राहणे आणि हौसला गमावून बसणे ही बाब सर्वच अभावग्रस्तांना उद्ध्वस्त करणार्‍या फॅसिझमला दार उघडून देण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आजही मूल्यसंघर्ष पार विझून गेला असं नाही. भांडवलशाहीने स्वत:चा एकतर्फी विजय जाहीर करण्याचा खेळ केला असला तरी हा विजय खरा नव्हे. जगात आणि देशातील वेगवेगळ्या भागात हा संघर्ष थांबला नाही. परिवर्तनवाद्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक बुरबुरे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. सतेश्वर मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. त्रिलोक हजारे स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक रत्नाकर मेश्राम यांनी केले. मुख्य संयोजक प्रवीण कांबळे संचालन केले. शामराव हाडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)