शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करा!

By admin | Updated: May 12, 2014 01:01 IST

भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत.

 नागपूर : भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत. अशावेळी परिवर्तनवाद्यांनीसुद्धा या संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करावा. नवभांडवली जागतिकीकरणाचं,नव-साम्राज्यवाद्यांच्या उदारीकरणाचं आणि खासगीकरणाचं आक्रमण उद्ध्वस्त करण्यासाठी याचा उपयोग करा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्यमाने आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि निळाई सामाजिक व सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णचंद्र बुटी हॉल रामदासपेठ येथे आयोजित आंबेडकरी काव्यसंगितीला सुरुवात झाली. उद्घाटनीय कार्यक्रमात डॉ. मनोहर यांनी बीजभाषण केले. साहित्यिक अशोक बुरबुरे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. प्रदीप आगलावे, राहुल दहीकर, प्रा. सतेश्वर मोरे प्रमुख अतिथी होते. डॉ. मनोहर म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि माध्यमक्रांतीने इहवाद, बुद्धिवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधूता या आधुनिक मूल्यांचा महाप्रकल्प अमान्य केलेला आहे. नवभांडवलशाहीच्या उदारीकरणाने आणि खासगीकरणाने जगाचं रूपांतर हृदयशून्य बाजारपेठेत केलेले आहे. मानवी मूल्यांना पदच्युत करून त्यांच्याजागी अर्थमूल्यांची प्रस्थापना केली जात आहे. या नवभांडवली उदारीकरणामुळे परिवर्तनवादी माणूस उदास व्हायला लागला आहे. परंतु हा संक्रमणाचा काळ आहे. तो पाहुण्यासारखा असतो. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीतील सैनिकांचे हे निराश होणे प्रस्थापितांच्या दारात झोळी घेऊन जात राहणे आणि हौसला गमावून बसणे ही बाब सर्वच अभावग्रस्तांना उद्ध्वस्त करणार्‍या फॅसिझमला दार उघडून देण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आजही मूल्यसंघर्ष पार विझून गेला असं नाही. भांडवलशाहीने स्वत:चा एकतर्फी विजय जाहीर करण्याचा खेळ केला असला तरी हा विजय खरा नव्हे. जगात आणि देशातील वेगवेगळ्या भागात हा संघर्ष थांबला नाही. परिवर्तनवाद्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक बुरबुरे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. सतेश्वर मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. त्रिलोक हजारे स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक रत्नाकर मेश्राम यांनी केले. मुख्य संयोजक प्रवीण कांबळे संचालन केले. शामराव हाडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)