शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
2
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
3
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
4
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
5
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
6
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
7
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
8
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
9
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
10
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
11
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
12
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
14
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
15
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मातीचा वापर

By गणेश हुड | Published: April 26, 2024 2:35 PM

Nagpur : पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरुम व गिट्टीचा वापर न करता मातीचा वापर; मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट दिल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून मी समृध्द तर गाव समृध्द आणि गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.  नागपूर जिल्ह्यात मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना राबवली जात आहे. परंतु निविदा न काढता पाणंद रस्त्यांची कामे होत असून यासाठी मुरुम व गिट्टीचा वापर न करता मातीचा सर्रास वापर केला जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पाणंद रस्त्यांचा मुद्दा उपस्थित  केला. निविदा न काढता जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेल्या ११ जणांच्या पॅनलच्या माध्यमातून आपल्या मर्जीतील कंत्राटारांना पाणंद रस्त्यांची कामे दिली जात असल्याचा आरोप आहे. 

११ जणांच्या माध्यमातूनच कामे करणे नियमात आहे का, असा सवाल उपस्थित केला. यावरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.  जिल्हाधिकारी कार्यालयाचा विषय असल्याचे सांगत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी अधिकची माहिती देण्याचे टाळले. त्यानंतर इतरही सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला.मातोश्री पाणंद रस्त्याकरिता २०२३-२४ साठी जिल्हा नियोजन समितीतून ७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी असल्याचे सांगण्यात येते. पांदण रस्त्यांची कामे करण्यासाठी ११ जणांचे पॅनल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निश्चित करण्यात आले आहे. या पॅनलच्या माध्यमातून मर्जीतील कंत्राटदारांना खैरात वाटली जात आहे. शेतकऱ्यांपेक्षा कंत्राटदारांचे भले होणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Governmentसरकारroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर