शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

धुक्यांमुळे पिकांवर ‘अवकाळी’ संकट; २० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2023 08:10 IST

Nagpur News धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सुनील चरपे

नागपूर : धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किडींचा प्रादुर्भाव व जमिनीचे तापमान कमी हाेऊन पिकांमध्ये आंतरिक बदल हाेत असल्याने नुकसान हाेते, असेही त्यांनी सांगितले.

धुके व थंडीची तीव्रता विदर्भात सर्वाधिक असून, तुलनेत मराठवाडा, खानदेश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात कमी असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या वातावरणाचा गहू, हरभरा, मका, वाटाणा यासह इतर रब्बी तर कपाशी, तूर या खरीप व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान हाेत आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या असून, नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील काही भागात कडाक्याच्या थंडीमुळे तूर व कपाशीची पिके वाळली आहेत.

धुक्यामुळे पिकांवर किडींसाेबतच बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी याेग्य उपाययाेजना करायला हव्या, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.

राेग व किडींचा प्रादुर्भाव

धुक्यामुळे तुरीवर शेंगा पाेखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. तुरी व हरभऱ्याचा फुलाेर गळताे. गव्हाची पाने पिवळी पडतात. माेसंबीचा अंबिया बहार गळत असून, आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने बहार गळताे. संत्र्याचा अंबिया बहार फुटीवर विपरित परिणाम हाेताे, अशी माहिती डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.

शीतलहरमुळे पीक वाळली

नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागातील पिकांना शीतलहरीचाही फटका बसला आहे. त्यामुळे कपाशी व तुरीचे पीक वाळले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जमिनीचे तापमान अचानक कमी हाेऊन पिकांमध्ये अचानक आंतरिक बदल हाेत असल्याने पिकांची वाढ खुंटल्यागत हाेते. त्यामुळे रब्बी पिके पूर्ण वाढ न हाेता अकाली वाळत असल्याने उत्पादनात घट हाेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेणार आहे.

विभागनिहाय पेरणीक्षेत्र

पिके - नागपूर - अमरावती

गहू - ९९,६८० - १,४०,५२२

हरभरा - २,२१,३५५ - ६,१६,२८८

मका - ५,७५२ - १२,०९४

कापूस - ६,४४,१६७ - १०,७५,९५४

तूर - १,७२,८३८ - ४,२२,८९५

टॅग्स :agricultureशेती