शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

धुक्यांमुळे पिकांवर ‘अवकाळी’ संकट; २० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2023 08:10 IST

Nagpur News धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सुनील चरपे

नागपूर : धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किडींचा प्रादुर्भाव व जमिनीचे तापमान कमी हाेऊन पिकांमध्ये आंतरिक बदल हाेत असल्याने नुकसान हाेते, असेही त्यांनी सांगितले.

धुके व थंडीची तीव्रता विदर्भात सर्वाधिक असून, तुलनेत मराठवाडा, खानदेश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात कमी असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या वातावरणाचा गहू, हरभरा, मका, वाटाणा यासह इतर रब्बी तर कपाशी, तूर या खरीप व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान हाेत आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या असून, नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील काही भागात कडाक्याच्या थंडीमुळे तूर व कपाशीची पिके वाळली आहेत.

धुक्यामुळे पिकांवर किडींसाेबतच बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी याेग्य उपाययाेजना करायला हव्या, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.

राेग व किडींचा प्रादुर्भाव

धुक्यामुळे तुरीवर शेंगा पाेखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. तुरी व हरभऱ्याचा फुलाेर गळताे. गव्हाची पाने पिवळी पडतात. माेसंबीचा अंबिया बहार गळत असून, आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने बहार गळताे. संत्र्याचा अंबिया बहार फुटीवर विपरित परिणाम हाेताे, अशी माहिती डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.

शीतलहरमुळे पीक वाळली

नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागातील पिकांना शीतलहरीचाही फटका बसला आहे. त्यामुळे कपाशी व तुरीचे पीक वाळले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जमिनीचे तापमान अचानक कमी हाेऊन पिकांमध्ये अचानक आंतरिक बदल हाेत असल्याने पिकांची वाढ खुंटल्यागत हाेते. त्यामुळे रब्बी पिके पूर्ण वाढ न हाेता अकाली वाळत असल्याने उत्पादनात घट हाेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेणार आहे.

विभागनिहाय पेरणीक्षेत्र

पिके - नागपूर - अमरावती

गहू - ९९,६८० - १,४०,५२२

हरभरा - २,२१,३५५ - ६,१६,२८८

मका - ५,७५२ - १२,०९४

कापूस - ६,४४,१६७ - १०,७५,९५४

तूर - १,७२,८३८ - ४,२२,८९५

टॅग्स :agricultureशेती