शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरात वीज बिलावरून असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:56 IST

तब्बल तीन महिन्यानंतर एकाच वेळी मिळालेल्या भरमसाट वीज बिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी लोकांची गर्दी हिंसक झाली.

ठळक मुद्देतुळशीबाग कार्यालयात तणाव :गार्डला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल तीन महिन्यानंतर एकाच वेळी मिळालेल्या भरमसाट वीजबिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी लोकांची गर्दी हिंसक झाली. भरमसाट बिलाबाबत तक्रार करण्यासाठी लोक आले होते. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु असंतुष्ट लोक हिंसेवर उतरले. महावितरणच्या गार्डला मारहाण करण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांशीही असभ्य वर्तणूक केली गेली. याप्रकरणी महावितरणने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.कोविड-१९ मुळे नागरिकांना मार्चनंतर विजेचे बिल आलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला मीटर रीडिंग घेऊन बिल पाठवले जात आहे. या बिलामुळे नागरिक चक्रावले आहेत. इतका विजेचा वापर झाल्याचे ते मान्य करायलाच तयार नाहीत. महावितरणच्या सर्वच कार्यालयात अशा लोकांची दररोज गर्दी होत आहे. टोकन देऊन त्यांना कार्यालयात सोडले जात आहे. महावितरणच्या तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी सकाळी जवळपास दीडशेवर लोक आपली तक्रार घेऊन धडकले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या चिंतेऐवजी त्यांना आपल्या विजेच्या बिलाचीच अधिक चिंता होती. कार्यालयातील लिपिक त्यांना बिलासंदर्भात समजावून सांगत होते. याचदरम्यान आनंदम फिडरमध्ये ब्रेकडाऊन झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी रवाना झाले. दरम्यान, महाल येथील मनोज धोपटे हे सुद्धा आपले बिल घेऊन तिथे पोहोचले. लिपिक पूर्वेश ठाकरे यांनी त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अधिक बिल आल्याचा त्यांचा दावा होता. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, धोपटे बाहेर निघाल्यानंतर ते इतर लोकांना भडकवू लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसून आल्याने नागरिकांना टोकन वाटणारे गार्ड चंद्रशेखर बन्सोड यांनी धोपटे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान धोपटेने बन्सोड यांच्यावर हल्ला केला. तिथे पोहचलेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांच्याकडेही लोक धावून गेले. आरडाओरड ऐकून महावितरणचे इतर कर्मचारी बाहेर आले. लोकांनी त्यांच्याशी असभ्य वर्तणूक केली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रसन्न श्रीवास्तव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी धोपटेसह भोसेकरविरुद्ध ३५६,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.कार्यालयांच्या सुरक्षेत वाढमहावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता महावितरणच्या सर्व कार्यालयाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांनाही देण्यात आली आहे. कंपनीचे अधिकारी शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कार्यालयाच्या परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करणार आहेत. दोडके यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की, तीन महिन्याचे बिल असल्याने स्वाभाविकपणे ते अधिक आहे. उन्हाळ्यात वाढलेला विजेचा वापर आणि १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेले नवीन दर याचा परिणामही विजेच्या बिलावर पडला आहे. सध्या नागरिकांच्या सुविधेसाठी हप्त्यामध्ये वीज बिल भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल