शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

‘अनलॉक’ प्रक्रिया अन् चित्रपटगृहांची फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:06 IST

Cinema hall corona कोरोना नावाच्या ऐतिहासिक घटनाक्रमामुळे टाळेबंद असलेली चित्रपटगृहे तब्बल साडेसात महिन्यानंतर ‘अनलॉक’ करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, चित्रपटगृहांचे पुन: संचलन अत्यंत कठीण झाले आहे.

ठळक मुद्देनवा सिनेमाच नाही तर रिलिज काय करणार?डागडुजी अन् साफसफाईला लागणार वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बंद करणे जेवढे सोपे असते, तेवढेच कठीण सुरू करणे असते. चित्रपटगृहांसंदर्भात ही बाब तंतोतंत लागू पडतेय. कोरोना नावाच्या ऐतिहासिक घटनाक्रमामुळे टाळेबंद असलेली चित्रपटगृहे तब्बल साडेसात महिन्यानंतर ‘अनलॉक’ करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, ज्या सहजतेने राज्य शासनाने हा निर्णय घेतला गेला त्याच सहजतेने चित्रपटगृहांचे पुन: संचलन अत्यंत कठीण झाले आहे.

चित्रपटक्षेत्राला अद्यापही उद्योगाचा दर्जा मिळाला नसला तरी मोठ्यात मोठ्या उद्योगापेक्षा हे क्षेत्र तसूभरही कमी नाही. एकसाथ हजारो कोटीची उलाढाल असलेल्या या क्षेत्राची चित्रपटगृहे ही जीवनवाहिनी आहेत. मात्र, टाळेबंदीने ही जीवनवाहिनी बाधित झाली. भलीमोठी इमारत, त्यात अत्याधुनिक सुविधा, निरंतर साफसफाई, वीज आदींनी सजलेले चित्रपटगृहे अचानक बंद पडली आणि जादूची छडी चालावी तशी ही गृहे एकाएकी वर्दळीला मुकली. तब्बल साडेसात महिने चित्रपटगृहे केवळ शोभेचा हत्ती बनून राहिली आणि त्याचा फटका मालक, कर्मचाऱ्यांना बसला.

आता दीर्घकाळानंतर चित्रपटगृहांना मिळालेली मोकळीक आनंद देणारी बाब असली तरी पुन्हा श्रीगणेशा अवघड झाला आहे. विशेष म्हणजे, किमान दहा दिवस तरी विस्कटलेल्या यंत्रणेची घडी व्यवस्थित करण्यात जाणार आहे. त्यातच सुरू झालेल्या चित्रपटगृहांत प्रेक्षकांना दाखवायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जे सिनेमे प्रेक्षकांनी आधीच बघितले आणि दूरचित्रवाणीवर आता दररोज दिसत आहेत. ते सिनेमे बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांकडे कसे वळणार, या प्रश्नासोबतच कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही जसाच्या तसाच असताना प्रेक्षक सिनेमागृहात येण्याची रिस्क घेतील का, असा सवाल आहे. विशेष म्हणजे, नवे चित्रपट रिलिज करण्यासाठी निर्मातेही पुढाकार घेत नसल्याने वितरकही हतबल झाले आहेत. या सर्व पेचात चित्रपटगृहांची फजिती झाली आहे.

प्रेक्षकांसोबतच चित्रपटगृहांनाही प्रतीक्षा

मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाली तेव्हा अनेक मोठ्या बजेटची आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारे सिनेमे रिलिजसाठी सज्ज होते तर अनेक चित्रपट पाईपलाईनमध्ये होते. टाळेबंदीत अनेक निर्मात्यांनी कन्टेंट शिळे होण्याच्या भीतीने ओटीटीचा पर्याय निवडला आणि निश्चित गुंतवणूक काढण्यासोबतच नफा कमावला. मात्र, प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचण्यात यशस्वी होणारे मोठ्या स्टार्सचे सिनेमे अजूनही बारगळले आहेत. प्रेक्षकांना खेचणारी अन् तोटा भरून काढणाऱ्या सिनेमांची प्रतीक्षा चित्रपटगृहांना आहे.

जानेवारीशिवाय नवे चित्रपट नाहीच!

संसर्गाचा प्रकोप मंदावला आहे आणि निश्चित दिलासा मिळण्याची अपेक्षा जानेवारीपर्यंत निर्मात्यांना आहे. त्यामुळे, दिवाळी, नाताळ हे सिनेमांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सण चित्रपट रिलिजिंगशिवाय जाणार आहेत. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेनंतरही चित्रपटगृहांना जानेवारीशिवाय पर्याय नसणार आहे.

मोठ्या बॅनरचे सिनेमे रिलिज झाल्यावरच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे, आम्ही त्यांची वाट बघतो आहोत. १३ नोव्हेंबरला नवा चित्रपट येण्याची शक्यता आहे. तोवर चित्रपटगृहांची व्यवस्था होऊन जाईल.

- प्रतीक मुणोत, सीईओ, पंचशिल सिनेमा

 

टॅग्स :cinemaसिनेमाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस