विद्यापीठाद्वारे ग्रामीण भागातील उत्पादनाला संशोधनाची जोड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:17+5:302021-01-17T04:09:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची भेट ...

विद्यापीठाद्वारे ग्रामीण भागातील उत्पादनाला संशोधनाची जोड ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील उत्पादनाला आवश्यक संशोधनाची जोड देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
राज्यपालांनी सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आणि प्र-कुलगुरू संजय दुधे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उन्नत भारत अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विद्यापीठाद्वारे या प्रकल्पावर नेमके किती काम करण्यात आले, याबाबत विचारणा केली. यावेळी कुलगुरूंनी आपापल्या विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती सादर केली.
बॉक्स
महाविद्यालयातील वर्ग सुरू करण्यावरही चर्चा
याप्रसंगी विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्रत्यक्ष वर्ग कधी सुरू करावेत व ते कसे संचालित करावे, यावरही चर्चा झाली.