शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

काँग्रेसची एकी, अन अंतर्गत बेकीमुळे भाजपची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 07:00 IST

Nagpur news पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली.

ठळक मुद्देगडकरींची छाप प्रचारात दिसली नाही जबरदस्त परिवर्तन घडलेच

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक असलेले अनिल सोले यांना ऐनवेळी थांबवून महापौर संदीप जोशी यांना दिलेली उमेदवारी भाजपमधील अनेकांच्या पचनी पडली नाही. गेल्यावेळी पदवीधरांवर असलेली गडकरींची छाप यावेळी कुठेच दिसली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती किल्ला लढवला पण पदवीधरांना ते रुचले नाहीत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर चालविलेल्या कॅम्पेनमध्ये काँग्रेसनेही हात धुवून घेतले. शेवटी अभिजित वंजारी यांच्यासारख्या नव्या दमाच्या उमेदवाराला भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात यश आले.

पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले हे गडकरी यांचे खंदे समर्थक असतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनामुळे महापौर संदीप जोशी यांना तिकीट मिळाले. मुळात सोले यांचे तिकीट कापून ते जोशी यांना देणे हा बदलच पक्षातील अनेकांना न पचणारा होता. घोषणेनंतर जोशी यांनी गडकरींचे आशीर्वाद घेतले. पण त्यानंतरही गडकरी समर्थक खुल्या मनाने सोबत आले नाहीत. नाराज सोले समर्थकांनी पक्षशिस्तीपोटी उघड नाराजी दाखविली नाही. मात्र, मतपत्रिकेत ती व्यक्त केली. शेवटच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून बसले. बूथपर्यंत जाऊन प्रचार केला. अनेकांच्या उघड तर काहींच्या गुप्त भेटी घेतल्या. पण मतदारांना ते आकर्षित करू शकले नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर कोहळे या दोन आमदारांचे तिकीट कापल्यानंतरही त्या जागी भाजपच निवडून आली. या अनुभवामूळे उमेदवार बदलला तरी भाजपची ‌‘व्होट बँक‘ फुटत नाही, या भ्रमात नेते होते. शेवटी त्यांचा हा भ्रम तुटला आणि भाजपच्या धुरीणांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व नागपुरात उमेदवारी न मिळताच वंजारी यांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा करून आपला मोर्चा पदवीधर मतदारसंघाकडे वळविला होता. मायक्रो प्लॅनिंग करीत सहाही जिल्ह्यात स्वत:चे नेटवर्क उभे केले. प्रत्यक्ष मतदार नोंदणीवर भर दिला. काँग्रेसनेही त्यांच्या कामावर विश्वास दाखवत तिकीट दिले. एरव्ही गटातटात विभागलेली काँग्रेस यावेळी एकदिलाने लढली. पहले भाजपसे बचेंगे तभी तो आपसमे लढेंगे, अशी सामंजस्याची भूमिका काँग्रेसचे मंत्री व नेत्यांनी घेतली. बैठका

पक्षसंघटनेसह प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने वंजारी यांच्या पाठिशी उभा राहिला. पदवीधर निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसचे बूथ लागले. त्यामुळे भाजप नेत्याच्या कृपादृष्टीसाठी पडद्यामागे लपणाऱ्या काही नेत्यांना प्रत्यक्ष समोर येऊन काम करावे लागले. महाविकास आघाडी लढत असल्यामुळे राष्ट्रवादीनेही मोलाची साथ दिली तर भाजपवर टपून असलेल्या शिवसेनेनेही प्रचारात जीव ओतला. शेवटी तिघांनी मिळून ‌भाजपची शिकार केली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग गडकरी- फडणवीसांच्या नागपुरात यशस्वी करून दाखवला.

बहुजनवाद जोरात

 पदवीधर ही सुशिक्षितांची निवडणूक समजली जाते. मात्र, या वेळी निवडणुकीत जात व बहुजनवाद जोरात चालला. एरव्ही भाजपची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या तेली समाजाची एकगठ्ठा मते आपला माणूस म्हणून वंजारी यांच्या पारड्यात पडली. संघाचा उमेदवार विरुद्ध बहुजन असे चित्र निर्माण रंगविण्यात सामाजिक संघटनांना यश आले. याचा भाजपला मोठा फटका बसला. भाजपने हा धोका आधीच ओळखून प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रभारी बनविले होते. तर प्रचाराचा पूर्ण फोकस वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्यावर केंद्रित केला. मात्र, त्यांनाही मतदारांनी सिरियसली घेतले नाही. ब्रेकनंतर मिळालेल्या पहिल्याच जबाबदारीत बावनकुळे फेल ठरले.

टॅग्स :Abhijit Wanjariअभिजीत वंजारी