शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

नागपूर शहर मंडळांतर्गत ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने ३९ नागरिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:57 IST

२०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देपाच जणांनाच नुकसानभरपाई : २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत विजेच्या धक्क्यामुळे किती प्राणांतिक अपघात झाले, यात किती व्यक्ती व प्राण्यांचा बळी गेला, यातील किती अपघातांत महावितरण जबाबदार ठरले, मिळालेली नुकसानभरपाई यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीदरम्यान नागपूर शहर मंडळाअंतर्गत विजेचा धक्का लागून ३९ जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ११, २०१७-१८ मध्ये ११ तर २०१८-१९ मध्ये १७ जणांचा जीव गेला. यातील पाच जणांना १८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.शिवाय ३० प्राण्यांचादेखील मृत्यू झाला व त्यासंदर्भात ११ जनावरांच्या मालकांना ४ लाख ३२ हजारांची नुकसानभरपाई देण्यात आली.

 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यूnagpurनागपूरRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता