शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

नागपूर शहराला अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा विळखा; मनपाला कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 20:00 IST

Nagpur News २०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे.

ठळक मुद्देएक हजारांहून अधिक टॉवर, परवानगीसाठी अर्ज केवळ २५७

नागपूर : मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असला तरी शहरात हजारावर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. यातील फक्त २५७ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी अर्ज आले आहेत. पैकी १०० टॉवरला महापालिकेने परवानगी दिली आहे. उर्वरीत सर्व टॉवर अनधिकृत असतानाही महापालिकेला कारवाई करणे शक्य नसल्याने मनपाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.

२०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे. नव्या वसाहतींमध्ये रस्ते, पाणी या सारख्या मूलभूत सोयी- सुविधा नसल्या तरी इमारतींवर मोठमोठे मोबाइल टॉवर उभे आहेत. या टॉवरच्या संख्येवर महापालिकेचे नियंत्रण नाही. राज्यभरातील मोबाईल टॉवरसाठी धोरण आखण्याचा निर्णय २०१२ मध्ये शासनाने घेतला होता. त्यानंतर मोबाईल कंपन्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने धोरण ठरविण्याचे आदेश दिले; परंतु, अद्याप मोबाईल टॉवरबाबत शासनाचे धोरण आले नाही. टॉवर उभारताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तपासले जात नसल्याचे मुद्दे समोर येत आहे.

- मोबाईल टॉवरसाठी गच्ची उपलब्ध करून देणारे धोक्यापासून अनभिज्ञ

मोबाईल टॉवर लावण्यासाठी घर किंवा गच्ची उपलब्ध करून देणाऱ्यांना महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते. महिन्याला पैसा मिळत असल्याने मोबाईल टॉवरच्या दृष्यपरिणामाचा फटका कुटुंबीयांना बसू शकतो. याकडे ते कानाडोळा करतात. मोबाईल टॉवर असलेल्या घरात एक मंद आवाज सतत सुरू असतो. या घरात प्रवेश केल्यावर नवीन व्यक्तीस त्याची जाणीव होते. मात्र, सरावाचा भाग झाल्याने गच्ची मोबाईल टॉवरसाठी भाड्याने देणाऱ्यांना याची जाणीव होत नाही. जास्तवेळ मोबाईल टॉवरच्या सानिध्यात राहिल्यास मात्र कालांतराने किडनी, हृदय किंवा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो, असे काही संशोधनातून निदर्शनास आले आहे.

- फ्रिक्वेंसी मोजण्यासाठी यंत्रणाच नाही

शहरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या स्पर्धेतून फ्रिक्वेंसी वाढविली जाते. तसे करणे अधिक धोकादायक असते. टॉवरमधून ध्वनीलहरी किती प्रमाणात निघतात आणि त्याचा मानवी जीवावर किंवा पशु- पक्ष्यांवर काय परिणाम होतो? याकडेही कोणाचे लक्ष नाही. प्रदूषण नियंत्रण बोर्ड किंवा कोणत्याही खासगी संस्थेचे फ्रिक्वेंसीमापक यंत्र शहरात नाही. यामुळे मोबाईल कंपन्यांनी किती प्रमाणात फ्रिक्वेंसी वाढविली याची पुसटशीही कल्पना ग्राहक किंवा पर्यावरणवाद्यांना नाही, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांची आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल