शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नागपूर शहराला अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा विळखा; मनपाला कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 20:00 IST

Nagpur News २०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे.

ठळक मुद्देएक हजारांहून अधिक टॉवर, परवानगीसाठी अर्ज केवळ २५७

नागपूर : मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असला तरी शहरात हजारावर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. यातील फक्त २५७ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी अर्ज आले आहेत. पैकी १०० टॉवरला महापालिकेने परवानगी दिली आहे. उर्वरीत सर्व टॉवर अनधिकृत असतानाही महापालिकेला कारवाई करणे शक्य नसल्याने मनपाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.

२०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे. नव्या वसाहतींमध्ये रस्ते, पाणी या सारख्या मूलभूत सोयी- सुविधा नसल्या तरी इमारतींवर मोठमोठे मोबाइल टॉवर उभे आहेत. या टॉवरच्या संख्येवर महापालिकेचे नियंत्रण नाही. राज्यभरातील मोबाईल टॉवरसाठी धोरण आखण्याचा निर्णय २०१२ मध्ये शासनाने घेतला होता. त्यानंतर मोबाईल कंपन्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने धोरण ठरविण्याचे आदेश दिले; परंतु, अद्याप मोबाईल टॉवरबाबत शासनाचे धोरण आले नाही. टॉवर उभारताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तपासले जात नसल्याचे मुद्दे समोर येत आहे.

- मोबाईल टॉवरसाठी गच्ची उपलब्ध करून देणारे धोक्यापासून अनभिज्ञ

मोबाईल टॉवर लावण्यासाठी घर किंवा गच्ची उपलब्ध करून देणाऱ्यांना महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते. महिन्याला पैसा मिळत असल्याने मोबाईल टॉवरच्या दृष्यपरिणामाचा फटका कुटुंबीयांना बसू शकतो. याकडे ते कानाडोळा करतात. मोबाईल टॉवर असलेल्या घरात एक मंद आवाज सतत सुरू असतो. या घरात प्रवेश केल्यावर नवीन व्यक्तीस त्याची जाणीव होते. मात्र, सरावाचा भाग झाल्याने गच्ची मोबाईल टॉवरसाठी भाड्याने देणाऱ्यांना याची जाणीव होत नाही. जास्तवेळ मोबाईल टॉवरच्या सानिध्यात राहिल्यास मात्र कालांतराने किडनी, हृदय किंवा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो, असे काही संशोधनातून निदर्शनास आले आहे.

- फ्रिक्वेंसी मोजण्यासाठी यंत्रणाच नाही

शहरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या स्पर्धेतून फ्रिक्वेंसी वाढविली जाते. तसे करणे अधिक धोकादायक असते. टॉवरमधून ध्वनीलहरी किती प्रमाणात निघतात आणि त्याचा मानवी जीवावर किंवा पशु- पक्ष्यांवर काय परिणाम होतो? याकडेही कोणाचे लक्ष नाही. प्रदूषण नियंत्रण बोर्ड किंवा कोणत्याही खासगी संस्थेचे फ्रिक्वेंसीमापक यंत्र शहरात नाही. यामुळे मोबाईल कंपन्यांनी किती प्रमाणात फ्रिक्वेंसी वाढविली याची पुसटशीही कल्पना ग्राहक किंवा पर्यावरणवाद्यांना नाही, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांची आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल