शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

नागपूर शहराला अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा विळखा; मनपाला कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 20:00 IST

Nagpur News २०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे.

ठळक मुद्देएक हजारांहून अधिक टॉवर, परवानगीसाठी अर्ज केवळ २५७

नागपूर : मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असला तरी शहरात हजारावर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. यातील फक्त २५७ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी अर्ज आले आहेत. पैकी १०० टॉवरला महापालिकेने परवानगी दिली आहे. उर्वरीत सर्व टॉवर अनधिकृत असतानाही महापालिकेला कारवाई करणे शक्य नसल्याने मनपाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.

२०११ मध्ये शहरात १७५ मोबाईल टॉवर होते. त्यात सातत्याने वाढ होत असून, मोबाईल टॉवरची संख्या १,००० वर पोहाेचली आहे. नव्या वसाहतींमध्ये रस्ते, पाणी या सारख्या मूलभूत सोयी- सुविधा नसल्या तरी इमारतींवर मोठमोठे मोबाइल टॉवर उभे आहेत. या टॉवरच्या संख्येवर महापालिकेचे नियंत्रण नाही. राज्यभरातील मोबाईल टॉवरसाठी धोरण आखण्याचा निर्णय २०१२ मध्ये शासनाने घेतला होता. त्यानंतर मोबाईल कंपन्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने धोरण ठरविण्याचे आदेश दिले; परंतु, अद्याप मोबाईल टॉवरबाबत शासनाचे धोरण आले नाही. टॉवर उभारताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तपासले जात नसल्याचे मुद्दे समोर येत आहे.

- मोबाईल टॉवरसाठी गच्ची उपलब्ध करून देणारे धोक्यापासून अनभिज्ञ

मोबाईल टॉवर लावण्यासाठी घर किंवा गच्ची उपलब्ध करून देणाऱ्यांना महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते. महिन्याला पैसा मिळत असल्याने मोबाईल टॉवरच्या दृष्यपरिणामाचा फटका कुटुंबीयांना बसू शकतो. याकडे ते कानाडोळा करतात. मोबाईल टॉवर असलेल्या घरात एक मंद आवाज सतत सुरू असतो. या घरात प्रवेश केल्यावर नवीन व्यक्तीस त्याची जाणीव होते. मात्र, सरावाचा भाग झाल्याने गच्ची मोबाईल टॉवरसाठी भाड्याने देणाऱ्यांना याची जाणीव होत नाही. जास्तवेळ मोबाईल टॉवरच्या सानिध्यात राहिल्यास मात्र कालांतराने किडनी, हृदय किंवा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो, असे काही संशोधनातून निदर्शनास आले आहे.

- फ्रिक्वेंसी मोजण्यासाठी यंत्रणाच नाही

शहरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या स्पर्धेतून फ्रिक्वेंसी वाढविली जाते. तसे करणे अधिक धोकादायक असते. टॉवरमधून ध्वनीलहरी किती प्रमाणात निघतात आणि त्याचा मानवी जीवावर किंवा पशु- पक्ष्यांवर काय परिणाम होतो? याकडेही कोणाचे लक्ष नाही. प्रदूषण नियंत्रण बोर्ड किंवा कोणत्याही खासगी संस्थेचे फ्रिक्वेंसीमापक यंत्र शहरात नाही. यामुळे मोबाईल कंपन्यांनी किती प्रमाणात फ्रिक्वेंसी वाढविली याची पुसटशीही कल्पना ग्राहक किंवा पर्यावरणवाद्यांना नाही, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांची आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल