शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: August 19, 2023 18:28 IST

भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविणार

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही, म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवले, ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे. त्यामुळे वैफल्यातून ते गरळ ओकत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केली.

बावनकुळे म्हणाले, सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचं डोकं काम करत नाही आहे. पुन्हा सत्तेत येण्याची संधी नाही. पक्ष गेला चिन्ह गेले, राष्ट्रवादी भाजपसोबत आली, पुन्हा कधी सत्तेत येऊ शकत नाही हे दुःख उद्धव ठाकरे यांना आहे. हे दुःख सामनातून मांडून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून चूक केली ती आता यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे ते मुखपत्रातून अशा पद्धतीने टीका करीत आहेत. आमचे मुंबईचे नेते पदाधिकारी या मुखपत्राविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा ठासून दावा

शिंदेच मुख्यमंत्री राहणार

- विरोधी पक्ष नेते म्हणून काही बोलावे लागते म्हणून विजय वडेट्टीवार बोलतात. २०० च्या वर बहुमत असलेले आमचे सरकार आहे. २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असून त्यांच्याच नेतृत्वात अजित पवार यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक मतदारसंघात ५० हजार घरी भेटी

- भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातील ५० हजार घरांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. राज्यात ५१ टक्के मतं मिळवणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही संघटनात्मक प्रवास करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार