शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ग्रामीण भागात दारुड्या पोलिसाने दोघींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:28 IST

Accident Nagpur News धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले.

ठळक मुद्देधानकापणी करून घराकडे जाताना करुण अंतएक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले. यात दोन महिला ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रिया ढाब्याजवळ मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. रविता वासुदेव राऊत (१८) रा.पचखेडी तर सोनू गुलाब चांदेकर (३४) अशी मृत महिलांची नावे आहे. यात लक्ष्मी श्रीकृष्ण राऊत (३४) ही जखमी झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार वेलतूरवरून सुसाट वेगात दुचाकी क्रमांक एम.एच. ४ ९ / व्ही ४७८१ पचखेडीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी धानकापणीचे काम आटोपून महिला मजूर येत होत्या. दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीचालकाचे लक्ष न राहिल्याने व वेगावरून नियंत्रण सुटल्याने वाहन महिलांना चिरडत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. ही दुचाकी गोवर्धन वातूजी भोयर, रा.ब्राह्मणी चालवित होते. गोवर्धन हा लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो मूळचा ब्राह्मणी येथील राहणार आहे.

या अपघातात रविता व सोनू, लक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर काही वेळपर्यंत त्या जागीच पडून होत्या. एका स्थानिकाने याबाबत ठाणेदार किशोर वैरागडे यांना उपरोक्त अपघाताची माहिती दिली. यानंतर जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे हलविण्यात आले. त्यापैकी रविताचा मृत्यू झाला. तर सोनू हिला नागपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालावली. जखमी लक्ष्मी हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी भोयर याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३३७,३०४ सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भोयर यांच्यासोबत दुचाकीवर आणखी एक जण स्वार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर वैरागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .मदतीअभावी गेला रविताचा व सोनूचा जीवअपघातानंतर शेतमजूर महिला जखमी अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी महिला वेदनेने विव्हळत होत्या. मदतीची याचना करीत होत्या. मात्र काहीजण केवळ मोबाईलवर फोटो काढत राहीले. कुणीही खासगी वाहनाने किंवा रस्त्यावरील वाहन थांबवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले नाही. सोबतच्या महिला जखमींना धीर देत असल्याचे पहायला मिळाले. वेळेवर उपचार मिळाले असते तर रविताचा व सोनूचा जीव वाचला असता. बघ्यांच्या अशा संवेदनहीनतेमुळे रविता व सोनूचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे .

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू