शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूरच्या ग्रामीण भागात दारुड्या पोलिसाने दोघींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:28 IST

Accident Nagpur News धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले.

ठळक मुद्देधानकापणी करून घराकडे जाताना करुण अंतएक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले. यात दोन महिला ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रिया ढाब्याजवळ मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. रविता वासुदेव राऊत (१८) रा.पचखेडी तर सोनू गुलाब चांदेकर (३४) अशी मृत महिलांची नावे आहे. यात लक्ष्मी श्रीकृष्ण राऊत (३४) ही जखमी झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार वेलतूरवरून सुसाट वेगात दुचाकी क्रमांक एम.एच. ४ ९ / व्ही ४७८१ पचखेडीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी धानकापणीचे काम आटोपून महिला मजूर येत होत्या. दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीचालकाचे लक्ष न राहिल्याने व वेगावरून नियंत्रण सुटल्याने वाहन महिलांना चिरडत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. ही दुचाकी गोवर्धन वातूजी भोयर, रा.ब्राह्मणी चालवित होते. गोवर्धन हा लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो मूळचा ब्राह्मणी येथील राहणार आहे.

या अपघातात रविता व सोनू, लक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर काही वेळपर्यंत त्या जागीच पडून होत्या. एका स्थानिकाने याबाबत ठाणेदार किशोर वैरागडे यांना उपरोक्त अपघाताची माहिती दिली. यानंतर जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे हलविण्यात आले. त्यापैकी रविताचा मृत्यू झाला. तर सोनू हिला नागपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालावली. जखमी लक्ष्मी हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी भोयर याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३३७,३०४ सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भोयर यांच्यासोबत दुचाकीवर आणखी एक जण स्वार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर वैरागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .मदतीअभावी गेला रविताचा व सोनूचा जीवअपघातानंतर शेतमजूर महिला जखमी अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी महिला वेदनेने विव्हळत होत्या. मदतीची याचना करीत होत्या. मात्र काहीजण केवळ मोबाईलवर फोटो काढत राहीले. कुणीही खासगी वाहनाने किंवा रस्त्यावरील वाहन थांबवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले नाही. सोबतच्या महिला जखमींना धीर देत असल्याचे पहायला मिळाले. वेळेवर उपचार मिळाले असते तर रविताचा व सोनूचा जीव वाचला असता. बघ्यांच्या अशा संवेदनहीनतेमुळे रविता व सोनूचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे .

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू