शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता'

By नरेश डोंगरे | Updated: November 24, 2023 18:19 IST

सकाळी ६ पासून सुरिवात : ६ तासांची भट्टी, रोजच्या रोज होतो जेवणात बदल 

नरेश डोंगरेनागपूर : शहर असो अथवा गावातील रहिवासी. अपवाद वगळता बहुतांश जणांकडे सकाळचा चहाही तयार व्हायचा असतो. ‘त्या’ वसाहतीत मात्र भल्या सकाळीच किचन सुरू होते. सुमारे अडीच हजार जणांना सकाळी १० ते ११ या वेळेत जेवण द्यायचे असल्यामुळे भल्या सकाळपासूनच भात, पोळ्या, वरण-भाजीच्या तयारीची लगबग सुरू होते. सकाळीच भट्टी लावली जाते अन् सुमारे ५० जणांच्या परिश्रमातून ‘त्या’ सर्वांच्या ‘क्षुधा तृप्ती’ची सुविधा तयार केली जाते. हिवाळा असो, पावसाळा असो की उन्हाळा. वर्षातील १२ महिने आणि ३६५ दिवस हा नित्यक्रम अखंडितपणे सुरू असते. सण-वार असो की आणखी कोणताही दिवस त्या वसाहतीतील अर्थात कारागृहातील किचन आणि भत्त्याला सुटी नसतेच.

ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी १८६४ साली नागपूरला मध्यवर्ती कारागृह तयार केले. या कारागृहाची सध्याची बंदीवानांची क्षमता १९०० कैद्यांची असली तरी येथे रोज सुमारे अडीच हजार कैदी बंदिस्त असतात. कधी कधी ही संख्या २७०० ते २८०० पर्यंत जाते. नव्या गुन्ह्यातील कैद्यांना आतमध्ये डांबणे आणि जामीन झालेल्यांना येथून मुक्त करणे, ही रोजचीच प्रक्रिया. तरीसुद्धा सुमारे २५०० कैदी येथे मुक्कामी असतातच. त्यांना सकाळी ७ वाजता चहा नाश्ता दिला जातो. त्यानंतर सकाळी १० ते ११.३० पर्यंत सर्वांना जेवण दिले जाते. परत रात्रीचे जेवण त्यांना ७ च्या आतमध्येच देण्याचे प्रयोजन आहे. कारण रात्री ७ नंतर सर्व कैद्यांना बराकीत बंद करायचे असते. त्यामुळे सकाळचे जेवण आटोपताच तास-दोन तासांनंतर सायंकाळच्या जेवणाचीही भट्टी येथे सुरू केली जाते.

सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेच्या जेवणाऱ्यांची संख्या रोज किमान पाच हजार जणांची असते. त्यांच्यासाठी दोन्ही वेळेला भातपोळ्या तर असतातच वरण किंवा भाजी वेगवेगळी तयार केली जाते. कधी डाळभाजी, कधी आलूवांगे, कधी काही तर कधी काही, असा हा रोजचा मेणू असतो. त्याला ‘भत्ता’ म्हटले जाते.

असा तयार होतो दोन वेळेचा भत्ता

गहू (पीठ) - १००० किलोतांदूळ (भात) - २५० ते ३०० किलोडाळ - १०० किलो

तेल, मसाल्याची लिस्ट वेगळी 

पोळी, भात आणि डाळीचे ठिक आहे. डाळ आणि भाज्या बनविण्यासाठी लागणारे टोमॅटो, मिरची सांबार (सर्व एकत्र) पालेभाज्या भाज्या सुमारे २०० किलो लागतात. मात्र, तेल, मीठ, मिरची, मसाले आणि ईतर पदार्थ नेमके किती लागतात, ते संबंधितांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरे म्हणजे, उपरोक्त आकडेवारी जवळपास ५ हजार कैद्यांच्या जेवणाची आहे. त्यात रोज कैद्यांच्या संख्येनुसार बदल होतो. 

टॅग्स :foodअन्नjailतुरुंगPrisonतुरुंगnagpurनागपूर