शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता'

By नरेश डोंगरे | Updated: November 24, 2023 18:19 IST

सकाळी ६ पासून सुरिवात : ६ तासांची भट्टी, रोजच्या रोज होतो जेवणात बदल 

नरेश डोंगरेनागपूर : शहर असो अथवा गावातील रहिवासी. अपवाद वगळता बहुतांश जणांकडे सकाळचा चहाही तयार व्हायचा असतो. ‘त्या’ वसाहतीत मात्र भल्या सकाळीच किचन सुरू होते. सुमारे अडीच हजार जणांना सकाळी १० ते ११ या वेळेत जेवण द्यायचे असल्यामुळे भल्या सकाळपासूनच भात, पोळ्या, वरण-भाजीच्या तयारीची लगबग सुरू होते. सकाळीच भट्टी लावली जाते अन् सुमारे ५० जणांच्या परिश्रमातून ‘त्या’ सर्वांच्या ‘क्षुधा तृप्ती’ची सुविधा तयार केली जाते. हिवाळा असो, पावसाळा असो की उन्हाळा. वर्षातील १२ महिने आणि ३६५ दिवस हा नित्यक्रम अखंडितपणे सुरू असते. सण-वार असो की आणखी कोणताही दिवस त्या वसाहतीतील अर्थात कारागृहातील किचन आणि भत्त्याला सुटी नसतेच.

ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी १८६४ साली नागपूरला मध्यवर्ती कारागृह तयार केले. या कारागृहाची सध्याची बंदीवानांची क्षमता १९०० कैद्यांची असली तरी येथे रोज सुमारे अडीच हजार कैदी बंदिस्त असतात. कधी कधी ही संख्या २७०० ते २८०० पर्यंत जाते. नव्या गुन्ह्यातील कैद्यांना आतमध्ये डांबणे आणि जामीन झालेल्यांना येथून मुक्त करणे, ही रोजचीच प्रक्रिया. तरीसुद्धा सुमारे २५०० कैदी येथे मुक्कामी असतातच. त्यांना सकाळी ७ वाजता चहा नाश्ता दिला जातो. त्यानंतर सकाळी १० ते ११.३० पर्यंत सर्वांना जेवण दिले जाते. परत रात्रीचे जेवण त्यांना ७ च्या आतमध्येच देण्याचे प्रयोजन आहे. कारण रात्री ७ नंतर सर्व कैद्यांना बराकीत बंद करायचे असते. त्यामुळे सकाळचे जेवण आटोपताच तास-दोन तासांनंतर सायंकाळच्या जेवणाचीही भट्टी येथे सुरू केली जाते.

सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेच्या जेवणाऱ्यांची संख्या रोज किमान पाच हजार जणांची असते. त्यांच्यासाठी दोन्ही वेळेला भातपोळ्या तर असतातच वरण किंवा भाजी वेगवेगळी तयार केली जाते. कधी डाळभाजी, कधी आलूवांगे, कधी काही तर कधी काही, असा हा रोजचा मेणू असतो. त्याला ‘भत्ता’ म्हटले जाते.

असा तयार होतो दोन वेळेचा भत्ता

गहू (पीठ) - १००० किलोतांदूळ (भात) - २५० ते ३०० किलोडाळ - १०० किलो

तेल, मसाल्याची लिस्ट वेगळी 

पोळी, भात आणि डाळीचे ठिक आहे. डाळ आणि भाज्या बनविण्यासाठी लागणारे टोमॅटो, मिरची सांबार (सर्व एकत्र) पालेभाज्या भाज्या सुमारे २०० किलो लागतात. मात्र, तेल, मीठ, मिरची, मसाले आणि ईतर पदार्थ नेमके किती लागतात, ते संबंधितांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरे म्हणजे, उपरोक्त आकडेवारी जवळपास ५ हजार कैद्यांच्या जेवणाची आहे. त्यात रोज कैद्यांच्या संख्येनुसार बदल होतो. 

टॅग्स :foodअन्नjailतुरुंगPrisonतुरुंगnagpurनागपूर