शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

उपराजधानी हादरली; कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:39 IST

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला नागपूरच्या गुन्हेगारांची सलामी

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत पोलिसांचा कडक सुरक्षा बंदोबस्त असताना दारू तस्करीच्या टोळीयुद्धातून दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर-अमरावती मार्गावरील वडधामना येथे सोमवारी सकाळी घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलिस यंत्रणेची भंबेरी उडाली आहे.

महेश उर्फ सलमान गजभिये (१९) आणि योगेश मेश्राम (३०, दोघे रा. भिवसनखोरी) अशी मृतांची नावे आहेत. सलमान आणि योगेश दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. सलमानविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल होता. योगेशलाही तडीपार करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचाही भिवसनखोरीत अवैध दारूचा अड्डा होता. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी भिवसनखोरीचा दारू अड्डा कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीत हलविला होता.

दारूमाफिया भिवसनखोरीऐवजी गोंडखैरी परिसरात दारूभट्ट्या चालवित आहेत. येथून दारू घेऊन भिवसनखोरीत भेसळ करून विकण्यात येत होती. या हत्याकांडातील आरोपीसुद्धा अवैध दारूच्या धंद्यात आधीपासूनच सक्रिय आहेत. दारू तस्करीवरून सलमान आणि योगेशचा प्रतिस्पर्धी कुख्यात आरोपी अब्बाससोबत आधीपासूनच वाद सुरू होता. अब्बासने सलमानच्या चेहऱ्यावर वस्तऱ्याने हल्लाही केला होता. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांचा काटा काढण्याची धमकी देत होते. सलमान आणि योगेश सोमवारी पहाटे बाइकवरून दारू आणण्यासाठी गोंडखैरीला गेले होते. त्याची अब्बासला भणक लागली. तो आपले साथीदार रितिक नाईक, बोंडा आणि दीपक बिसेन सोबत कारने (क्र. एमएच ०१ एआर ३५४९) त्यांचा पाठलाग करू लागला.

अमरावती मार्गावर वडधामनाजवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास कारमध्ये बसलेल्या आरोपींनी सलमान आणि योगेशच्या बाइकला धडक दिली. यात दोघेही खाली पडले. त्यानंतर आरोपींनी दोघांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह दुभाजकाजवळ सोडून आरोपी फरार झाले. काही वेळानंतर वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले. या हत्याकांडामुळे ऐन अधिवेशन काळात वाडी पोलिसांचा ताप वाढला आहे.

पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह

भिवसनखोरी आणि गोंडखैरी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूच्या भट्ट्या सुरू आहेत. या भट्ट्यांवर पोलिसांनी अनेकदा कारवाईसुद्धा केली आहे. तरीदेखील राजरोसपणे हा गोरखधंदा सुरू आहे. या हत्याकांडामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

मुठीत सापडली मिरचीपूडची पाकिटे

मृतांनी आपला जीव वाचविण्यासाठी हल्लेखोरांचा मुकाबला केल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी डोळ्यांत मिरचीपूड टाकून योगेश आणि सलमानची हत्या केली. मृतांनी त्यांच्या हातातून मिरचीपूडची पाकिटे हिसकावली. त्यामुळे मृतांच्या मुठीत मिरचीपूडची पाकिटे मिळाली आहेत.

सुरुवातीला पोलिस म्हणाले हा अपघात

वाडी पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला; परंतु मृतदेहांची अवस्था आणि घटनास्थळावरील चित्र काही वेगळेच सांगत होेते. मात्र, सायंकाळनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर