शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

ट्रकची कारला धडक; भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी

By सुनील चरपे | Updated: February 27, 2023 17:10 IST

अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना

काेंढाळी (नागपूर) : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. त्यात कारचालकासह अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील महामार्ग पाेलिस केंद्राजवळ साेमवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

कारचालक आदित्य सुखदेव माने (वय ३२, रा. मॉडेल कॉलनी, द्वीप बंगला चौक, पुणे) व बिसेन पवन मराठे (२२, रा. मानेगाव-बिरसा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) अशी मृतांची, तर संतलाल कमललाल पंचेश्वर (२५) व रितू संतलाल पंचेश्वर (२०, दाेघेही रा. मानेगाव-बिरसा, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.

चाैघेही एमएच-०३/सीव्ही-११६८ क्रमांकाच्या कारने छत्रपती संभाजीनगर येथून अमरावती मार्गे नागपूरच्या दिशेने येत हाेते. दरम्यान, खुर्सापार शिवारात वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून नागपूर-अमरावती मार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४५/एई-६३९९ क्रमांकाच्या ट्रकने कारला जाेरात धडक दिली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाचा चुराडा हाेऊन ती रस्त्यावरच उलटली. यात दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

संजय गायकवाड यांनी दाेन्ही जखमींना लगेच काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दाेघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डाॅ. पुष्पक खवशी यांनी दिली. शिवाय दाेघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

हाेळीनिमित्त गावी परतताना झाला घात

बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत कामगार म्हणून काम करायचे. हाेळीनिमित्त त्या तिघांनाही त्यांच्या मूळ गावी जायचे हाेते. आदित्य एकटाच एमएच-०३/सीव्ही-११६८ क्रमांकाच्या कारने पुण्याहून नागपूरला येत हाेता. त्यातच त्या तिघांना नागपूर मार्गेच बालाघाटकडे जायचे असल्याने आदित्यने त्यांना प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले हाेते.

रस्ता दुरुस्ती अपघाताच्या पथ्यावर

हा राष्ट्रीय महामार्ग चाैपदरी असून, त्याला दुभाजक आहे. या महामार्गावर बहुतांश वाहने सुसाट वेगाने धावतात. या महामार्गावरील कोंढाळी-तळेगाव (जिल्हा वर्धा) या लेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या लेनवरील वाहतूक तळेगाव-कोंढाळी लेनवर वळवली आहे. एकाच लेनवरून दाेन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे या लेनवरील वाहतूक दाेन तास ठप्प हाेती.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर