शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्ख्या भावांची दगडाने ठेचून हत्या : चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:09 IST

दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बेल्लारपारच्या जंगलात सात दिवसांनी आढळले मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नांद) : दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोघेही मंगळवार(दि. १६)पासून घरी परत आले नव्हते. शिवाय, ते दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात उमरेड व भिवापूर तालुक्यातून दारूचा पुरवठा करण्याचे काम करायचे. याच व्यवसायातील वैमनस्यातून दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.संतोषसिंग अवतारसिंग तिलबितिया (२४) व संगतसिंग अवतारसिंग तिलबितिया (२२) रा. महालगाव, ता. भिवापूर अशी मृतांची तर, दसरतसिंग बलवीरसिंग तिलपितिया, जयसिंग बलवीरसींग तिलपितिया, दीपकसिंग बलवीरसींग तिलपितिया दोघेही रा. सिर्सी, ता. उमरेड व राजू ऊर्फ गणप्या राऊत रा. महालगाव, ता. भिवापूर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही दारूच्या पेट्या चिमूर (जिल्हा चंद्रपूर) तालुक्यातील पोहोचविण्यासाठी मंगळवारी (दि. १६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या एमएच-४०/एएफ-०७९० क्रमांकाच्या मोटरसायकलने घराबाहेर पडले होते. त्या दिवशी दारूच्या पेट्या पोहोचवून ते महालगाव येथे परतही आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाही. दोघांचेही मोबाईल संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने, त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.परिणामी, बुधवारी (दि. १७) बेला पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिर्सी पोलीस चौकीत दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु, त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, सोमवारी (दि. २२) दुपारी १२ वाजताच्या सुमारास बेल्लारपार येथील गुराख्यास लाकडाच्या ढिगातून दुर्गंधी आल्याने दोघांचेही मृतदेह या जंगलात आढळून आले. दगडाने वार केल्याने त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते. माहिती मिळताच बेला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी बेला पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर करीत आहेत.अवैध दारूविक्रीला सुगीचे दिवसचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाल्यापासून तिथे नागपूर जिल्ह्यातून रोज मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा पुरवठा केला जातो. त्यामुळे उमरेड व भिवापूर तालुक्यातील दारूविक्रेत्यांसोबतच ती दारू सुखरूप चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्याच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे या भागात काही जण गटागटाने दारू पोहोचविण्याचे काम करतात. ते उमरेड व भिवापूर तालुक्यातील दारू नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या भान्सुली (ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर)च्या जंगलात नेतात. तिथे ती चिमूर तालुक्यातील दारू पोहोचविणाºयाला हस्तांतरित करतात आणि माघारी परततात.पावसाची दडी व दुर्गंधीमुळे बिंग फुटलेदोघेही दारूच्या पेट्या पोहोचविल्यानंतर मोटरसायकलने जंगलमार्गे गावाला परत येत होते. नाल्याच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडविली व डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर चौघांनीही त्यांच्यावर दगडाने वार केले. दोघांनाही नाल्याच्या खोलगट भागात फेकून देत चौघांनी तिथून पळ काढला. त्यांच्या अंगावरील वस्तूही पिशवीत टाकून नाल्यात फेकल्या. मृतदेह लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी त्यावर लाकडं व काटेरी फांद्या रचल्या. नाल्याच्या पुरात दोन्ही मृतदेह वाहून जाईल, असा अंदाज त्यांनी लावला होता. परंतु, पावसाची दडी व मृतदेहांची दुर्गंधीमुळे बिंग फुटले.त्यांची मोटरसायकल व मोबाईल मात्र कुठेही आढळून आला नाही.

टॅग्स :Murderखूनforestजंगलnagpurनागपूर