शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:26 IST

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.

ठळक मुद्देजीवघेणे तापमान : बळी उष्माघाताचेच?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.बँक कॉलनी नरसाळा येथील ५० वर्षीय प्रवीण कडू एस.टी. मध्ये कंडक्टर आहे. ते मंगळवारी सकाळी एसटी स्टँड परिसरातील कार्यालयात टिनाच्या शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंबाझरी चौपाटीजवळ मंगळवारी सायंकाळी ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. जरीपटका येथील नारी गावातील नाल्याजवळ ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात फूटपाथवर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. तहसील पोलीस ठाणे हद्द्ीत बोहरा बिल्डिंगजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. याच परिसरातील तीन नळ चौकातही ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरंनी मृत घोषित केले.त्याचप्रकारे सक्करदरा परिसरातील आशीर्वादनगरात मंगळवारी दुपारी एक व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. तिला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विनोबा भावेनगर हुडकेश्वर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुकडे ले-आऊट अजनी येथील ५३ वर्षीय सुरेखा अशोक मोटघरे यांना मंगळवारी सकाळी नतेवाईकांनी झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजसमोर ६७ वर्षीय व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. मेडिकलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मेडिकल गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.गेल्या पंधरवड्यापासून हा प्रकार सुरु आहे. यादरम्यान १०० पेक्षा अधिक लोकांचा वेगवेगळ्या कारणामुळे जीव गेला. रस्त्यावर सापडलेल्या अनेक मृतांची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे त्यांचे मृतदेह सांभाळून ठेवणे आणि अंत्यसंस्कार करण्यामुळे पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये या कामासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेतात ते न सापडल्यास मृतावर अंत्यसंस्कार करतात.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूnagpurनागपूर