शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:26 IST

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.

ठळक मुद्देजीवघेणे तापमान : बळी उष्माघाताचेच?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.बँक कॉलनी नरसाळा येथील ५० वर्षीय प्रवीण कडू एस.टी. मध्ये कंडक्टर आहे. ते मंगळवारी सकाळी एसटी स्टँड परिसरातील कार्यालयात टिनाच्या शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंबाझरी चौपाटीजवळ मंगळवारी सायंकाळी ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. जरीपटका येथील नारी गावातील नाल्याजवळ ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात फूटपाथवर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. तहसील पोलीस ठाणे हद्द्ीत बोहरा बिल्डिंगजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. याच परिसरातील तीन नळ चौकातही ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरंनी मृत घोषित केले.त्याचप्रकारे सक्करदरा परिसरातील आशीर्वादनगरात मंगळवारी दुपारी एक व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. तिला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विनोबा भावेनगर हुडकेश्वर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुकडे ले-आऊट अजनी येथील ५३ वर्षीय सुरेखा अशोक मोटघरे यांना मंगळवारी सकाळी नतेवाईकांनी झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजसमोर ६७ वर्षीय व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. मेडिकलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मेडिकल गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.गेल्या पंधरवड्यापासून हा प्रकार सुरु आहे. यादरम्यान १०० पेक्षा अधिक लोकांचा वेगवेगळ्या कारणामुळे जीव गेला. रस्त्यावर सापडलेल्या अनेक मृतांची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे त्यांचे मृतदेह सांभाळून ठेवणे आणि अंत्यसंस्कार करण्यामुळे पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये या कामासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेतात ते न सापडल्यास मृतावर अंत्यसंस्कार करतात.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूnagpurनागपूर