शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:26 IST

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.

ठळक मुद्देजीवघेणे तापमान : बळी उष्माघाताचेच?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.बँक कॉलनी नरसाळा येथील ५० वर्षीय प्रवीण कडू एस.टी. मध्ये कंडक्टर आहे. ते मंगळवारी सकाळी एसटी स्टँड परिसरातील कार्यालयात टिनाच्या शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंबाझरी चौपाटीजवळ मंगळवारी सायंकाळी ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. जरीपटका येथील नारी गावातील नाल्याजवळ ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात फूटपाथवर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. तहसील पोलीस ठाणे हद्द्ीत बोहरा बिल्डिंगजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. याच परिसरातील तीन नळ चौकातही ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरंनी मृत घोषित केले.त्याचप्रकारे सक्करदरा परिसरातील आशीर्वादनगरात मंगळवारी दुपारी एक व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. तिला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विनोबा भावेनगर हुडकेश्वर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुकडे ले-आऊट अजनी येथील ५३ वर्षीय सुरेखा अशोक मोटघरे यांना मंगळवारी सकाळी नतेवाईकांनी झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजसमोर ६७ वर्षीय व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. मेडिकलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मेडिकल गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.गेल्या पंधरवड्यापासून हा प्रकार सुरु आहे. यादरम्यान १०० पेक्षा अधिक लोकांचा वेगवेगळ्या कारणामुळे जीव गेला. रस्त्यावर सापडलेल्या अनेक मृतांची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे त्यांचे मृतदेह सांभाळून ठेवणे आणि अंत्यसंस्कार करण्यामुळे पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये या कामासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेतात ते न सापडल्यास मृतावर अंत्यसंस्कार करतात.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूnagpurनागपूर