शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता शाळांचे होणार ट्युनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 9:53 AM

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक केंद्रातून दोन शाळा जोडणार शिक्षणासोबत भौतिक सुविधांचेही सहकार्य

ऑनलाईन लोकमत्नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भारत सरकार व राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अनेकवेळा निरनिराळे प्रयोग करून उपक्रम राबविले. याअंतर्गत आता दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत. त्यातील एक शाळा शाळासिद्धीमध्ये ‘अ’ श्रेणीत येणे आवश्यक आहे.सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव यांनी सर्वांगीण गुणवत्ता विकास (सगुण) (ट्युनिंग ऑफ स्कूल) कार्यक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांना माहिती गोळा करण्याचे काम दिले आहे. यासंदर्भातील आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.राज्यातील ४,८६० ग्रामीण भागातील समूह साधन केंद्र व शहरी भागातील शहर साधन केंद्रातील केंद्रप्रमुखांना केंद्रातील शाळांमधून शाळा सिद्धीमध्ये ‘अ’ श्रेणीप्राप्त एका शाळेची निवड करून, दुसरी एक शाळा जोडावयाची आहे. या निवडलेल्या दोन शाळांमध्ये सहकार्य घेणे व सहकार्य देणे अशा सामंजस्य आंतरक्रिया घडवून आणणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सात मुद्यांवर सहकार्य घेण्यास व सहकार्य करण्यास तयार आहे किंवा कसे? याबाबत स्पष्टपणे माहिती केंद्रप्रमुखांना नोंदवायची आहे.

केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरणे आवश्यकविद्या प्राधिकरणाचा ‘सगुण’ उपक्रम चांगला आहे. मात्र राज्यातील केंद्रप्रमुखांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. या उपक्रमाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवरच दिली आहे. शाळांच्या संख्यात्मक वाढीमुळे शाळांवर संनियंत्रण करण्यासाठी २४ वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आलेल्या समूह साधन केंद्राची फेररचना करण्यात यावी तरच गुणवत्ता विकासास चालना मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र