शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दंड मागितल्यामुळे टीटीईला सिकंदराबाद-बरौनी एक्स्प्रेसमध्ये मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:47 IST

रद्द झालेल्या ई-तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड मागितल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी टीटीईला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यस्थी करून टीटीईचा बचाव केल्यामुळे अनर्थ टळला.

ठळक मुद्देआरपीएफच्या मध्यस्थीमुळे जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रद्द झालेल्या ई-तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड मागितल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी टीटीईला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यस्थी करून टीटीईचा बचाव केल्यामुळे अनर्थ टळला.जितेंद्र जयंतराव दरभे (४०) रा. वॉकर रोड, महाल असे फिर्यादीचे टीटीईचे नाव आहे. ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टीटीई म्हणून कार्यरत आहेत. ०७००९ सिकंदराबाद-बरौनी रक्सोल एक्स्प्रेसमध्ये नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक प्रदीप दिनकर, संजय बोस, चंद्रशेखर वैद्य अणि टीटीई जितेंद्र दरभे असे चौघे ड्युटीवर होते. समोरच्या जनरल कोचमध्ये सीआयएसएफचे जवान, मागील जनरल कोचमध्ये आरपीएसएफ जवान होते. टीटीई तपासणी करीत स्लीपर कोचमध्ये गेले. त्यांनी प्रवाशांना तिकीट विचारले. सहा प्रवाशांनी त्यांना ई-तिकीट दाखविले. मात्र, हे तिकीट रद्द झालेले होते. त्यामुळे मुख्य तिकीट निरीक्षकांनी दंड मागितला. जवळपास सात हजार रुपये दंड होत असल्याचे टीटीईने सांगितले. यावरून प्रवासी संतापले आणि गाडी भूगाव जवळ असताना नकली टीसी दंड मागत असल्याची अफवा पसरविली. प्रवासी चिडल्यामुळे चारही टीटीई जीव मुठीत घेऊन सीआयएसएफ जवानाच्या कोचमध्ये पळाले. सेवाग्रामला गाडी थांबली असता प्रवाशांनी त्या कोचचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. नागपूर रेल्वे स्थानकावर दुपारी १ वाजता ही गाडी प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. यावेळी दिनकर, बोस आणि वैद्य हे तिघेही उतरून निघून गेले. प्रवाशांना जितेंद्र दरभे हे दिसताच त्यांना घेराव घालून मारहाण केली. यावेळी दरभे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, पर्स आणि मोबाईलही गहाळ झाला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान मदतीला धावून आले. शेषराव पाटील या जवानाने मध्यस्थी करून दरभे यांना गर्दीतून बाहेर काढल्यामुळे टीटीईचा जीव वाचला. काही वेळात गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली. दरम्यान, चारही टीटीर्इंनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली.टीटीर्इंची सुरक्षा धोक्यातया घटनेमुळे रेल्वे तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यावर अधिकार काय निर्णय घेतात, यावर टीटीई संघटनेकडून पुढचे धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे