शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

टेक्नॉलॉजीच्या त्सुुनामीने ग्रामीण व्यवस्था नष्ट होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:41 IST

आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्यच राहिले नाही. गावात वीज, वाहने, खत, यंत्र सर्व शहरातून येते. गावातील मुलेसुद्धा पुढचे शिक्षण शहरातच घेतात. त्यामुळे गावातील लोकसंख्या, उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे कुठलीही नवीन गुंतवणूक ग्रामीण अर्थव्यवस्थेत टिकाव धरू शकत नाही, असे मत आयआयएम बेंगळुरूचे अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भारत झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. भारत झुनझुनवाला : विणू काळे मेमोरिअल सेमिनार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चिटणवीस सेंटरमध्ये विणू काळे मेमोरिअल सेमिनारमध्ये मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला हाऊसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट बोर्डाचे संचालक आर्किटेक कीर्ती शहा व वेणू भारती फाऊंडेशनचे वैभव काळे उपस्थित होते. यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना डॉ. झुनझुनवाला म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाच्या उत्पन्नात कृषीचा वाटा ९० टक्के होता. तेव्हा ९० टक्के जनता गावात वास्तव्यास होती. आता देशाच्या उत्पन्नात कृषीचा वाटा १८ टक्के झाला आहे. तर गावात ४० टक्के जनता वास्तव्यास आहे. कारण गावामध्ये उत्पन्नाचे साधन संपलेले आहे. जमिनीची उत्पादन क्षमता सिमित आहे. कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन थांबले आहे. त्यामुळे अशा बकाल ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन गुंतवणूक टिकाव धरू शकणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जुळलेला बांबू येथे टिकाव धरू शकणार नाही. उलट शहरात बांबू व्यवसाय प्रगती करू शकतो. त्यासाठी बांबूवर संशोधन होणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बांबूची उपयोगिता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी बांबू संशोधन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. यावेळी बोलताना आर्किटेक कीर्ती शहा म्हणाले की, केंद्र सरकार ग्रामीण आवास योजनेवर मोठा खर्च करीत आहे. ६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ५० हजार घरे बांधण्यात आली आहेत. एवढी मोठी योजना राबविताना यात कुठलाही बिल्डर, आर्किटेक, कॉन्ट्रॅक्टर वापरण्यात आले नाही. गावातील व्यक्तीच घर बांधतो आहे. या आवास योजनांमध्ये बांबू टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होईल, बांबूपासून कमी खर्चात कसे टिकाऊ आणि मजबूत घर बांधता येईल, याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे संचालन वैभव काळे यांनी केले.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासnagpurनागपूर