शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ट्रॅक्टरच्या नावावर आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक; चौघांविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:59 IST

देवलापार परिसरातील प्रकार : ९.८० लाख रुपयांनी सहा आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून संबंधित चौघे बेपत्ता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराबाजार : कमी दरात नवीन ट्रॅक्टर विकत घेऊन देण्याची बतावणी करीत चौघांनी सहा आदिवासी शेतकऱ्यांची ९ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) परिसरात नुकताच घडला असून, शेतकऱ्यांनी त्या चौघांची देवलापार पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली आहे.

फसवणूक करणाऱ्यांमध्ये नरेंद्र चंद्रभान वाळके, मयाराम कुमरे दोघेही (रा. बोथिया पालोरा, ता. रामटेक), देवदास खंडाते (रा. सीतापूर, ता. रामटेक), महेंद्र पंचम धुर्वे (रा. पवनी, ता. रामटेक) या चौघांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले नाही. चौघेही त्यांच्या गावांमधून बेपत्ता असल्याची माहिती तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी दिली.

या चौघांनी उपासराव तुकाराम कोडवते, चंद्रभान मायाराव वरठी, अशोक बिरजू नराठी, ओमप्रकाश सुंदरलाल भलावी, सुनील आनंदराव उईके, कुंजीलाल नरसू कुमरे या सहा शेतकऱ्यांना पवनी येथील महेंद्र धुर्वे याच्या घरी बोलाविले होते. त्याच्याच घरी जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे कार्यालय आहे. याच ठिकाणी चौघांनी या शेतकऱ्यांना कमी किमतीत ट्रॅक्टर विकत घेऊन देण्याची बतावणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दोघांनी १ लाख ५० हजार रुपये, दोघांनी १ लाख ५५ हजार, एकाने १ लाख ७५ हजार आणि एकाने दोन लाख रुपये असे एकूण ९ लाख ८० हजार रुपये त्यांना दिले. 

तीन महिने पूर्ण होऊनही ट्रॅक्टर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी त्या चौघांची वारंवार संपर्क करायला भेटायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी असंबंद्ध उत्तरे देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. नंतर मात्र भेटणे व फोन बोलणे बंद केले. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी त्या चौघांविरुद्ध देवलापार पोलिस ठाण्यात व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.

पावत्यांवर कमी रक्कम नमूदउपासराव कोडवते व ओमप्रकाश भलावी यांनी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे तीन लाख रुपये दिले. त्या दोघांच्या पावत्यांवर प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये नमूद केले आहे. चंद्रभान वरठी व अशोक नराठी यांनी प्रत्येकी १ लाख ५५ हजार रुपयांप्रमाणे ३ लाख १० हजार रुपये दिले. त्यांच्या पावत्यांवर प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये, सुनील उईके यांनी १ लाख ७५ हजार रुपये देऊन त्यांच्या पावतीवर १ लाख ३० हजार रुपये, तर कुंजीलाल कुमरे यांनी दोन लाख रुपये देऊन त्यांच्याही पावतीवर १ लाख ३० हजार रुपये नमूद केले आहे. या सर्वांचे मिळून दोन लाख रुपये नेमके कशासाठी कमी नमूद केले, हे कळायला मार्ग नाही.

"संबंधित शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची आधी चौकशी केली जाईल. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविले जातील. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे."- नारायण तुरकुंडे, ठाणेदार, देवलापार 

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी