शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

ट्रॅक्टरच्या नावावर आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक; चौघांविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:59 IST

देवलापार परिसरातील प्रकार : ९.८० लाख रुपयांनी सहा आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून संबंधित चौघे बेपत्ता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराबाजार : कमी दरात नवीन ट्रॅक्टर विकत घेऊन देण्याची बतावणी करीत चौघांनी सहा आदिवासी शेतकऱ्यांची ९ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) परिसरात नुकताच घडला असून, शेतकऱ्यांनी त्या चौघांची देवलापार पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली आहे.

फसवणूक करणाऱ्यांमध्ये नरेंद्र चंद्रभान वाळके, मयाराम कुमरे दोघेही (रा. बोथिया पालोरा, ता. रामटेक), देवदास खंडाते (रा. सीतापूर, ता. रामटेक), महेंद्र पंचम धुर्वे (रा. पवनी, ता. रामटेक) या चौघांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले नाही. चौघेही त्यांच्या गावांमधून बेपत्ता असल्याची माहिती तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी दिली.

या चौघांनी उपासराव तुकाराम कोडवते, चंद्रभान मायाराव वरठी, अशोक बिरजू नराठी, ओमप्रकाश सुंदरलाल भलावी, सुनील आनंदराव उईके, कुंजीलाल नरसू कुमरे या सहा शेतकऱ्यांना पवनी येथील महेंद्र धुर्वे याच्या घरी बोलाविले होते. त्याच्याच घरी जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे कार्यालय आहे. याच ठिकाणी चौघांनी या शेतकऱ्यांना कमी किमतीत ट्रॅक्टर विकत घेऊन देण्याची बतावणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दोघांनी १ लाख ५० हजार रुपये, दोघांनी १ लाख ५५ हजार, एकाने १ लाख ७५ हजार आणि एकाने दोन लाख रुपये असे एकूण ९ लाख ८० हजार रुपये त्यांना दिले. 

तीन महिने पूर्ण होऊनही ट्रॅक्टर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी त्या चौघांची वारंवार संपर्क करायला भेटायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी असंबंद्ध उत्तरे देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. नंतर मात्र भेटणे व फोन बोलणे बंद केले. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी त्या चौघांविरुद्ध देवलापार पोलिस ठाण्यात व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.

पावत्यांवर कमी रक्कम नमूदउपासराव कोडवते व ओमप्रकाश भलावी यांनी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे तीन लाख रुपये दिले. त्या दोघांच्या पावत्यांवर प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये नमूद केले आहे. चंद्रभान वरठी व अशोक नराठी यांनी प्रत्येकी १ लाख ५५ हजार रुपयांप्रमाणे ३ लाख १० हजार रुपये दिले. त्यांच्या पावत्यांवर प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये, सुनील उईके यांनी १ लाख ७५ हजार रुपये देऊन त्यांच्या पावतीवर १ लाख ३० हजार रुपये, तर कुंजीलाल कुमरे यांनी दोन लाख रुपये देऊन त्यांच्याही पावतीवर १ लाख ३० हजार रुपये नमूद केले आहे. या सर्वांचे मिळून दोन लाख रुपये नेमके कशासाठी कमी नमूद केले, हे कळायला मार्ग नाही.

"संबंधित शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची आधी चौकशी केली जाईल. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविले जातील. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे."- नारायण तुरकुंडे, ठाणेदार, देवलापार 

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी